त्वामारूढं पवनपदवीमुद्गृहीतालकान्ताः
प्रेक्षिष्यन्ते पथिकवनिताः प्रत्ययादाश्वसन्त्यः।
कः संनद्धे विरहविधुरां त्वय्युपेक्षेत जायां
न स्यादन्योएप्य?हमिव जनो यः पराधीनवृत्तिः।।8।।
याचा अर्थ तू (मेघ) आकाशात वर गेलास म्हणजे आजपर्यंतच्या अनुभवावरून धीर आलेल्या, प्रवासाला गेलेल्या बायका आपल्या कुरळय़ा केसांची टोके वर उचलून मोठय़ा उत्कंठेने तुला पाहतील. आपली स्वारी उगवल्यावर विरहाने व्याकूळ झालेल्या भार्येला कोण बरे दूर करील? माझ्याप्रमाणे ज्याचे पराधीन जिणे आहे, असा दुसरा कोणी नसेल.
ह्यातील ‘पवनपदवीमारूढम्’ मध्ये पवनृवारा, पदवृस्थान…वाऱयाच्या स्थानावर आरूढ झालेला असा होतो. वाऱयाचे स्थान म्हणजे आकाश. त्यामुळे यांचा अर्थ आकाशात वर गेलेला असा होतो. ‘प्रत्ययात् आश्वसन्त्यः’ पूर्वी दळणवळणाची साधने सहज उपलब्ध नसल्याने पावसाळा संपल्यावर लोक फिरायला जात. परत पावसाळा सुरू होण्यापूर्वी परत येत. त्यानुसार आपले घरापासून दूर असलेले पती पावसाचे ढग दिसू लागले म्हणजे परत येतील असे वाटून उत्कंठेने त्याची वाट बघत. ‘संनद्ध’ म्हणजे कामगिरीवर निघणे. इंद्र ही पावसाची देवता. मेघ हा त्यांचा अधिकारी. त्याची कामगिरी म्हणजे पृथ्वीवर पाऊस पाडणे. ह्या कामगिरीवर निघालेला म्हणून संनद्ध!
ज्यांचे पती प्रवासाला गेले आहेत, त्यांच्या पत्नीला ‘प्रोषितभर्तृका’ म्हणतात. त्या काळच्या नियमानुसार त्यांनी कोणताही साजशृंगार करायचा नाही. त्यामुळे त्या केस मोकळे सोडून रहात. त्यामुळे मेघाकडे पाहताना त्या केस वर उचलून धरीत असा कविचा भाव आहे. पुढे यक्ष मेघनाला सांगतो—
मन्दं मन्दं नुदति पवनश्चानुकुलो यथा त्वां
वामश्चायं नदति मधुरं चातकस्ते सगन्धः।
गर्भाधानक्षणपरिचयान्नूनमाबद्धमालाः।
सेविष्यन्ते नयनसुभगं के भवन्तं बलाकाः।।9।।
अर्थः- तुला मंद मंद वारा वाहून नेत असताना चातक मधुर स्वरांनी तुझे स्तवन करतील. बगळे आकाशात रांगेने उभे राहून तुझी सेवा करतील.
भूमंडळावर जशा ‘पथिकवनिता’ म्हणजे पती प्रवासाला गेलेल्या स्त्रिया जशा तुला उत्कंठेने पाहतील, तशा बगळय़ांच्या माद्याही तुझी सेवा करतील, असे यक्षाने मेघाला सांगितले.