शेवटी अलका नगरीत यक्ष आपले घर कुठे आणि कसे आहे याचे वर्णन करू लागतो. त्याचे थोडेसे बाह्य वर्णन त्याने मागील श्लोकात केलेले आपण पाहिले. आता पुढे पाहूया….
वापी चास्मिन्मरकतशिलाबद्धसोपानमार्गा
हैमैश्छन्ना विकचकमलैः स्नग्धिवैदूर्यनालैः।
यस्यास्तोये कृतवसतोये मानसं संनिकृष्टं
नाध्यासन्ती व्यपगतशुचस्त्वामपि प्रेक्ष्य हंसाः।।13।।
अर्थः-तसेच त्या घरात पाचूच्या(मरकत) पायऱया बांधलेली, मऊ वैदूर्यमण्याप्रमाणे(पुष्कराज) देठ असलेल्या, फुललेल्या सुवर्णकमळांनी भरलेली विहीर आहे. तिच्या पाण्यात राहिलेले हंस खेदरहित होऊन, तुला जवळ आलेले पाहूनदेखील मानस सरोवरात जाण्याची इच्छा करीत नाहीत.
हंस पावसाळा जवळ आला की मानससरोवराकडे जातात. कारण एरवी इतर ठिकाणचे पाणी गढूळ होते. पण ह्या विहीरीतील पाणी स्वच्छ असल्यामुळे हंस तिथेच राहू इच्छितात.
वापी म्हणजे पायऱयांची विहीर. पूर्वी जलक्रीडेसाठी बहुतेक घरी वापी असत.
ह्या श्लोकात विशेषोक्ती अलंकार आहे.
तस्यास्तीरे रचितशिखरः पेशलैरिन्दनीलैः
क्रीडाशैलः कनककदलीवेष्टनप्रेक्षणीयः।
मद्गेहिन्याःप्रिय आणि सखे घेतला कातरेण
प्रेक्ष्योपान्तस्फुरिततडितं त्वांड तमेव स्मरामि।।14।।
अर्थः- त्या विहीरीच्या काठी सुंदर इंद्रनील मण्यांचे शिखर बांधलेला, सुवर्णकर्दळीच्या वेष्टनामुळे प्रेक्षणीय दिसणारा क्रीडापर्वत आहे. मित्रा, जवळच चमकणारी वीज असलेल्या तुला पाहिले म्हणजे-तो पर्वत माझ्या स्त्रीचा आवडता असल्याने मला लगेच त्याची आठवण होते.
इथे भोवती चमकणाऱया विजेचे वेष्टन असल्यामुळे मेघाला पाहिले की, यक्षाला त्या क्रीडापर्वताची आठवण होते. कारण त्या पर्वताभोवती सुवर्णकर्दळीचे वेष्टन असल्यामुळे तो त्या मेघांप्रमाणेच दिसत असे.