गोकुळ शिरगाव वार्ताहर
कणेरीवाडी (ता. करवीर) येथे जलजीवन मिशन पाणी योजना व विविध विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलताना बोलताना आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी खासदार धनंजय महाडिक (Dananjay Mahadik) यांच्यावर केली टीका. गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडीच्या काळात जल जीवन मिशन पाणी योजना याचा जास्तीत जास्त निधी दक्षिण मतदार संघात कसा आणता येईल यासाठी प्रयत्न केला असून यामध्ये खासदार संजय मंडलिक, आमदार ऋतुराज पाटील व आपण स्वतः या कामासाठी सातत्याने पाठपुरावा करून या ठिकाणी या मतदारसंघाचा व जिल्ह्याचा विकास करण्याचा आपण धडाका लावला आहे .
त्याचबरोबर नॅशनल हायवे व विमानतळाच्या संदर्भात भूसंपादन असो अथवा टर्मिनस बिल्डिंग असो अन्यथा इतर विमान उड्डाण सेवेसंदर्भात सातत्याने खासदार संजय मंडलिक व खासदार संभाजी राजे यांच्या सोबत विमानतळावर नेहमी बैठका घेऊन या सर्वांचा प्रश्न महाविकास आघाडीच्या काळात मार्गी लावण्याचे काम आम्ही केले आहे. पण आत्ताचेच नूतन खासदार हे अजून विमानातच असून आम्ही केलेल्या विविध विकास कामांचे पत्रक काढून ते वाटत आहेत .असा टोला खासदार महाडिक यांचे नाव न घेता आमदार सतेज पाटील यांनी लगावला.
यावेळी खासदार संजय मंडलिक म्हणाले विकास निधीसाठी आपण शिंदे गटात गेलो असून पुढच्या वेळेला गावामध्ये येऊ त्यावेळी आपण निधी दिलेला असावा असे गावात सांगता यावे म्हणून आपण शिंदे गटात गेल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर कणेरी वाडी गावचा शशिकांत खोत यांनी केलेल्या विकासा कामांचे त्यांनी कौतुक केले.
आमदार ऋतुराज पाटील म्हणाले तेरा गावच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न 344 कोटी निधी मंजूर केला आहे. तेरा गावे औद्योगिक वसाहतीत लागून असल्याने कागदावर लोकसंख्या वेगळी व गावामध्ये भाडे तत्त्वावर व नवीन वस्ती करून राहिलेले लोक यांची नोंद होत नसल्याने या योजनेमुळे पाण्याचा कोटा सातत्याने वाढत राहील शिवाय या 13 गावांचा पाण्याचा प्रश्न कायमचा मिटून जाईल .त्याचबरोबर कणेरी तलावातून 72 साली बांधलेला कॅनॉल तो सध्या पूर्ण नेस्तनाबूत झाला होता. त्यामुळे या तलावातून कणेरेवाडी ,नेरली त्याचबरोबर इतर खालील असलेल्या गावांना याचा पाण्याचा फायदा बंद झाला होता .हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी अडीच कोटी रुपयांचा निधी दिला असून हा कॅनॉल पूर्ण केल्याचे समाधान झाल्याचे आमदार पाटील यावेळी म्हणाले.
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत यांनी सुरुवातीला सर्वांचे स्वागत केले व गावात आठ कोटी 35 लाख रुपयांच्या विकास कामाचे त्यांनी उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करून घेतले. यावेळी पाण्याच्या टाकीसाठी लागणारी जमीन मोफत देणारे कणेरवाडी येथील रहिवासी असलेले डॉ. शिरीष दादासो चव्हाण व त्यांचे सर्व बंधू यांनी या पाण्याच्या टाकीसाठी जागा दिल्याबद्दल खोत व सर्व ग्रामस्थांनी त्यांचे यावेळी आभार मानले.
या कार्यक्रमाला कणेरीवाडीच्या सरपंच शामल कदम ,जिल्हा परिषद च्या माजी उपाध्यक्ष सरिता खोत, उपसरपंच शोभा खोत, सदस्य अरुण मोरे, पोलीस पाटील शिवाजी मोरे, संभाजी मोरे आधी सह गोकुळ शिरगाव,कणेरी, कोगील बुद्रुक या गावचे सरपंच व ग्रामस्थ या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.