दोन महिने रेंगाळलेल्या रस्ताकामाला सुरुवात झाल्याने वाहनधारकांतून समाधान : खड्ड्यांमुळे रस्ता उखडून झाला होता खराब
वार्ताहर / कणकुंबी
गेल्या चार-पाच महिन्यांपासून बेळगाव-चोर्ला, पणजी रस्त्याच्या दुऊस्तीच्या रेंगाळत असलेल्या कामाला चालना मिळाली असून उर्वरित बेटणे ते चोर्ला म्हणजे गोवा हद्दीपर्यंतच्या रस्ता दुऊस्तीच्या कामाला शुक्रवारपासून सुऊवात करण्यात आली आहे. बेळगाव-चोर्ला-पणजी या रस्त्यापैकी रणकुंडये ते चोर्ला या रस्त्याच्या दुऊस्तीसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पावणेतीन कोटी ऊपये मंजूर केले आहेत. सदर रस्त्याच्या दुऊस्तीला जानेवारीत रणकुंडये क्रॉसपासून प्रारंभ केला होता. दोन महिने लागून रणकुंडये ते चिखले क्रॉसपर्यंतच्या रस्त्यावरील केवळ मोठमोठ्या खड्ड्यांची दुऊस्ती करण्यात आली. त्यानंतर 11 मार्चपासून हे काम रेंगाळत गेले. चिखले ते चोर्लापर्यंत पावसाळ्यापूर्वी रस्त्याच्या दुरुस्तीचे काम होण्याची शक्मयता कमी होती म्हणून ‘तऊण भारत’ने या रस्त्याच्या दुऊस्ती संदर्भात वृत्त प्रसिद्ध करताच कामाला सुऊवात झाली. परंतु दोनच दिवसात पुन्हा काम बंद करण्यात आले. आठ दिवसाच्या विश्र्रांतीनंतर शुक्रवारपासून बेटणेपासून ते गोवा हद्द चोर्लापर्यंतच्या रस्त्याच्या दुऊस्तीच्या कामाला प्रारंभ झाला आहे.
सदर रस्त्याच्या दुऊस्तीचे काम धारवाड येथील व्यंकटेश कंपनीने घेतलेले असून जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांमध्ये रणकुंडये क्रॉसपासून ते चिखले क्रॉसपर्यंतच्या रस्त्यावरील मोठमोठ्या ख•dयांची दुऊस्ती करण्यात आली. परंतु लहान सहान ख•s दुऊस्तीमधून वगळण्यात आले. यामध्ये लहान सहान ख•s वगळून केवळ मोठमोठे खड्डे पडलेल्या ठिकाणचा रस्ता उखडून काढण्यात आला आणि त्यावर पुन्हा खडी घालून त्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे. दरम्यान रस्त्यावरील लहान खड्ड्यांकडे दुर्लक्ष करून केवळ मोठे खड्डे भरण्यावर कंत्राटदाराने भर दिला होता. 11 मार्चपासून चिखले क्रॉसपासून ते चोर्ला हद्दीपर्यंतच्या रस्त्याचे काम रेंगाळत पडले होते.रस्त्याचे दीड-दोन महिने काम बंद पडल्याने बेळगाव शिवप्रतिष्ठानचे जिल्हा अध्यक्ष किरण गावडे यांनी वेळोवेळी संबंधित अधिकारी व कंत्राटदाराला रस्त्याच्या दुऊस्ती संदर्भात तगादा लावल्याने व ‘तऊण भारत’मधून आवाज उठवून वृत्त प्रसिद्ध केल्याने कंत्राटदाराने मागील आठवड्यात कामाला सुऊवात केली. दोन दिवसात केवळ तीन खड्डे बुजवून पुन्हा आठ दिवस काम बंद ठेवले. त्यामुळे उर्वरित चोर्लापर्यंतच्या रस्त्याचे काम पुन्हा रेंगाळणार असे चित्र दिसत असताना शुक्रवारपासून कंत्राटदाराने पुन्हा सर्व यंत्रणेसह रस्त्याच्या दुऊस्तीच्या कामाला प्रारंभ केला आहे.