जिह्याचा बारावीचा निकाल 94.33 टक्के, मुलींचीच बाजी, उत्तीर्ण झालेल्यांचा जल्लोष
प्रतिनिधी/ सातारा
कोरोनानंतर दोन वर्षानंतर घेण्यात आलेल्या ऑफलाईन परीक्षेचा बारावीचा निकाल ऑनलाईन दुपारी जाहीर करण्यात आला. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी सुरुवातीला मोबाईलवरच आपला नंबर टाकून घरातूनच जाणून घेतल्यानंतर त्याची प्रिंट मिळवण्यासाठी नेट कॅफेत गर्दी केली होती. सातारा जिह्यात नियमित विद्यार्थी 34 हजार 434 उर्त्तीण होऊन जिह्याचा निकाल 94.33 टक्के लागला आहे. कोल्हापूर विभागात सातारा जिल्हा दुसऱया क्रमांकावर आला आहे. तर पुर्नप्रविष्ठ विद्यार्थ्यांमध्ये 359 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 42.78 टक्के निकाल लागला आहे. मुलांपेक्षा मुलींचा उत्तीर्ण होण्याचा टक्का जास्त आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांनी दिली.
कोरोनानंतर प्रथमच ऑफलाईन अशी बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. त्या परीक्षेचा निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आलेला आहे. दुपारी हा निकाल संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. आपला निकाल पाहण्यासाठी बारावीचे विद्यार्थी उत्सुक होते. जे बारावीला बसलेले विद्यार्थी आपला निकाल पाहण्यासाठी आपल्या मोबाईलचा वापर करत होते. घरात असलेल्या संगणकावर काहींनी निकाल पाहिला तर काहींनी आपल्या शेजाऱयांच्या मोबाईलवरुन निकाल पहात होते. उत्तीर्ण झाल्याचे पाहताच आनंद, उत्साह आणि जल्लोष पहायला मिळत होता. नेट कॅफेमध्ये प्रिंट काढण्यासाठी काही विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती. तर पहिले पेढय़ाचे दुकान गाठून पेढे घेण्यामध्ये काही विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. एकूणच निकाल चांगला लागल्याने आनंदी वातावरण जिह्यात पहायला मिळत होते.
बारावीसाठी सातारा जिह्यात 251 कनिष्ठ महाविद्यालये असून 50 परीक्षा केंद्रे व 222 उपकेंद्रे होती. 36 हजार 755 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 36 हजार 539 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी 34 हजार 434 विद्यार्थी उर्त्तीण होऊन जिह्याचा निकाल 94.33 टक्के लागला आहे. कोल्हापूर विभागात सातारा जिल्हा दुसऱया क्रमांकावर आला आहे. तर पूनःप्रविष्ठ विद्यार्थी सातारा जिह्यातून 840 विद्यार्थ्यांची नोंदणी केली होती. त्यापैकी 839 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी 359 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 42.78 टक्के निकाल लागला आहे.
सातारा जिह्यात विज्ञान शाखेचे 17 हजार 154 विद्यार्थी नोंदणी झाले होते. त्यापैकी 17127 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यामधील 16 हजार 944 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल 98.93 टक्के लागला आहे. कला शाखेसाठी 9 हजार 792 विद्यार्थी नोंदणी होते. त्यापैकी 9 हजार 660 जण प्रविष्ठ झाले होते. 8 हजार 283 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल 85.74 टक्के लागला आहे. वाणिज्य शाखेसाठी 8227 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 8201 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी 7772 विद्यार्थी उर्त्तीण होऊन 94.76 टक्के निकाल लागला. व्यावसायिक विभागासाठी 1 हजार 568 विद्यार्थी नोंदणी होते. त्यापैकी 1537 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 1422 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल 92.51 टक्के लागला आहे.
मुलींचीच सरशी
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सातारा जिह्यातून बारावीसाठी मुलांपेक्षा मुलींची सरशी लागली आहे. त्यामध्ये 19 हजार 795 मुलांची नोंदणी केली होती. त्यापैकी 19हजार 668 प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी 18123 उत्तीर्ण झाल्याने 92.14 टक्के निकाल लागला आहे. मुलींमध्ये 16 हजार 960 नोंदणी होत्या. त्यापैकी 16 हजार 871 प्रविष्ठ झाल्या होत्या. त्यापैकी 16 हजार 311 उत्तीर्ण झाल्याने 96.68 टक्के लागला आहे. तब्बल 4 टक्के ज्यादा मुलींचा निकाल लागलेला आहे.