भाजप नेत्यांविरोधात उचलणार पाऊल
वृत्तसंस्था/ हैदराबाद
तेलंगणा राष्ट्रीय समितीच्या आमदार कविता राव यांनी भाजपच्या दोन नेत्यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल करण्याची तयारी चालविली आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची कन्या असलेल्या कविता यांनी भाजप आमच्या कुटुंबाची प्रतिमा मलीन करू पाहत असल्याचा आरोप केला आहे. भाजप खासदार प्रवेश वर्मा आणि भाजपचे माजी आमदार मनजिंदर सिंह सिरसा यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल करणार आहे. दिल्लीत सुरू असलेल्या अबकारी धोरणाच्या चौकशीशी आमचे कुठलेच देणंघेणं नसल्याचा दावा कविता यांनी केला आहे. मद्यमाफियांच्या अनेक सदस्यांची दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्याशी भेट घडवून आणण्याचे काम कविता राव करायच्या असा आरोप भाजप नेत्यांनी केला होता.