नवी दिल्ली / वृत्तसंस्था
केरळची राजघानी असणाऱया थिरुवनंतपुरम येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे व्यवस्थापन अदानी एंटरप्राईझेस लिमिटेड या कंपनीच्या हाती सोपविण्यास विरोध करणारी केरळ सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. व्यवस्थापन सोपविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला होता. देशाचे सरन्यायाधीश उदय उमेश लळित आणि न्या. बेला त्रिवेदी यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळली. केरळ सरकारप्रमाणेच काही कर्मचारी संघटनांनीही केंद्र सरकारच्या या निर्णयाला विरोध केला होता. अदानी समूहाने या विमानतळाचे व्यवस्थापन ऑक्टोबर 2020 मध्ये हाती घेतले होते. केरळ सरकारने प्रथम केरळच्या उच्च न्यायालयात याचिका सादर केली होती. तथापि, ती फेटाळण्यात आली. उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात आली होती. तथापि, सर्वोच्च न्यायालयानेही उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे समर्थन केले आहे.