ऑनलाईन टीम / तरुण भारत :
जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या पॅनेलचा दारुण पराभव झाला. गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या भाजप-शिंदे गटाने या निवडणुकीत एकहाती सता मिळवली आहे. त्यावरून मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी खडसेंवर निशाणा साधला. खडसे राष्ट्रवादी संपवायला निघालेत, शरद पवारांनी त्यांना दिलेली एमएलसी परत घेतली पाहिजे, अशी टीका पाटील यांनी केली.
जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत एकनाथ खडसे, गिरीश महाजन आणि शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. 20 जागांसाठी 39 उमेदवार रिंगणात होते. पाचोरा मतदार संघाची जागा बिनविरोध झाली होती. उर्वरित 19 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत भाजप-शिंदे गटाने विजय मिळवला आहे. 16 जागा भाजप-शिंदे गटाला मिळाल्या आहेत.
या निवडणुकीत मुक्ताईनगर इथं एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. अखेरीस या निवडणुकीमध्ये एकनाथ खडसे यांना पराभवाचा सामना करावा लागला.