जिव्हाळा स्मरणिकेचे प्रकाशन : कार्यक्रमाला अनेकांची उपस्थिती
वार्ताहर /खानापूर
खानापूर तालुक्यासारख्या दुर्गम भागातून आलेले अनेक सुशिक्षित उद्योजक पुण्यासारख्या ठिकाणी यशस्वी व्यवसाय सांभाळतात. आपल्या भागाची शान व अभिमान राखण्याचा प्रयत्न करतात. पुण्यासारख्या मोठय़ा शहरांमध्ये विखुरलेल्या आपल्या समाज बांधवांना एकत्रित करून निर्माण केलेला गोतावळा अभिनंदनास पात्र
आहे.
गावाकडच्या मातीची शान राखण्यासाठी शैक्षणिक, सामाजिक कार्यातही नेहमी कार्यरत उद्योजक व पुणेस्थित खानापूरवासिय अभिनंदनास पात्र असल्याचे उद्गार खानापूर तालुका समितीचे युवा कार्यकर्ते निरंजन सरदेसाई यांनी खानापूर (बेळगाव) मित्रमंडळ पुणे आयोजित वार्षिक स्नेहमेळावा कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले. शनिवारी पुणे येथील मुक्ताई गार्डन, धायरी येथे हा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला.
स्मरणिका प्रकाशन
प्रमुख पाहुणे म्हणून पुणे मनपाचे नगरसेवक राजाभाऊ लायगुडे, माजी नगरसेवक काकासाहेब चव्हाण, हरिदास चरवड, विकासनाना दांगट, भाजपा युवा कार्यकर्ते सागर भुमकर, किशोर पोकळे, संदीप पोकळे, पूनम पाटील, अरविंद पाटील उपस्थित होते. या सर्वांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन व दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे-खानापूर मित्र मंडळाचे अध्यक्ष पीटर डिसोझा होते.
खानापूरहूनही मित्र उपस्थित
प्रारंभी उपस्थितांचे स्वागत मंडळाचे सचिव शिवाजी जळगेकर यांनी प्रस्तावना केली व मंडळाचा आढावा मांडला. खजिनदार रामचंद्र बाळेकुंद्री यांनी आर्थिक अहवाल सादर केला. या कार्यक्रमाला मंडळाचे अनेक सभासद सहपरिवार तसेच मित्र परिवारासह खानापूर-बेळगावहूनही उपस्थित
होते.
याप्रसंगी जिव्हाळा या स्मरणिकेच्या प्रकाशनाबरोबरच मंडळाच्या संकेतस्थळाचेही उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने खानापूर-बेळगाव भागातील पुणेस्थित गुणवंत विद्यार्थी, खेळाडू तसेच विशेष सामाजिक कार्य केलेल्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.
अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आणि पैठणी साडी लकी ड्रॉ यासारखे कार्यक्रमही स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजीव वाटुपकर आणि पांडुरंग काकतकर यांनी केले. देमाणी मष्णुचे यांनी आभार मानले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे संचालक लक्ष्मण काकतकर, बाळासाहेब देसाई, अजित पाटील, रामचंद्र निलजकर, नारायण पाटील, भगवंत चन्नेवाडकर, बाळकृष्ण पाटील, विजय पाटील, परशुराम निलजकर, सुरेश हालगी, केशव जावळीकर, नारायण गावडे, अशोक पाटील, राजाराम शिंदे, पांडुरंग पाटील, रामू गुंडप, महेश मळीक, परशुराम चौगुले, शिवाजी गावडा, ज्ञानेश्वर गावडे, उमाजी देवकर, लक्ष्मण पेडणेकर, बसाप्पा लाड, नागेश पाटील, सुभाष वीर, अशोक वीर, विठ्ठल सावंत याबरोबरच अनेक सभासदांनीही अथक परिश्रम घेतले.