कार्यकर्त्यांचे बेळगाव मध्यवर्ती समितीच्या पदाधिकाऱयांना निवेदन
खानापूर-
खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीत एकी घडवून आणण्यात यावी, यासाठी खानापूर तालुक्मयातील समितीच्या तरुण कार्यकर्त्यांनी शनिवारी बेळगाव मध्यवर्ती समितीच्या पदाधिकाऱयांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, कार्यदर्शी मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, माजी आमदार मनोहर किणेकर यांची भेट घेऊन एकीसंदर्भात चर्चा केली. सोमवारी खानापूर तालुक्मयातील समिती कार्यकर्त्यांची, नेत्यांची बैठक घेण्यात यावी, असा आग्रह धरला. यावेळी मध्यवर्तीच्या पदाधिकाऱयांनी सोमवारी खानापुरात शिवस्मारक येथे बैठक घेऊन हा वाद मिटवून एकी करण्याचे आश्वासन दिले. या बैठकीसाठी बेळगाव मध्यवर्ती समितीकडून दोन निरीक्षक पाठवून देण्यात येतील, असेही जाहीर करण्यात आले आहे. यावेळी दोन्ही गटात एकी करण्यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी खानापूर समितीच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांत झालेल्या दुहीमुळे तालुक्मयात राष्ट्रीय पक्ष आपले जाळे पसरत असून यामुळे मराठी तरुण राष्ट्रीय पक्षात जात आहेत. त्यामुळे चळवळीला मारक असून जर एकी झाली नाही तर तालुक्मयात समितीचे अस्तित्व संपून जाईल. यासाठी कोणत्याही परिस्थितीत तात्काळ एकी होणे गरजेचे आहे, असा आग्रह धरला. त्याला सकारात्मक प्रतिसाद देऊन मध्यवर्तीने सोमवारी बैठकीचे आयोजन करण्याचे सांगितले आहे. त्यानुसार सोमवारी येथील शिवस्मारकात सकाळी 11 वाजता तालुक्मयातील दोन्ही गटांच्या व समिती कार्यकर्त्यांची बैठक बोलाविण्यात आली आहे. या बैठकीला तालुक्मयातील दोन्ही गटाच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन माउली ग्रुप, समितीप्रेमी युवकांनी केले आहे.