वाहनधारकांना करावी लागतेय कसरत : शहरांतर्गत महामार्ग रस्त्याला वाली कोण? : मलप्रभा नदीवरील नवीन पुलाची दुरुस्तीही रखडली
वार्ताहर /खानापूर
खानापूर तालुक्मयाच्या ग्रामीण व शहरी भागात अनेक रस्ते विकासाच्या दिशेने वाटचाल करत असले तरी खानापूर शहरांतर्गत जाणाऱया महामार्गावरील रुमेवाडी नाका परिसरातील महामार्ग पूर्णतः खड्डय़ात हरवला आहे. त्यामुळे या महामार्गाला वाली कोण? असा प्रश्न प्रवासीवर्गातून उपस्थित केला जात आहे. रुमेवाडी नाका व परिसरात या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. या महामार्गावरील रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी अनेक वेळा अर्ज-विनंत्या झाल्या. पण तात्पुरत्या दुरुस्तीमुळे पुनः पुन्हा ’ये रे माझ्या मागल्या’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे या नाका परिसरातील मुख्य रहदारीच्या व दळणवळणाच्या ठिकाणी पन्नास फूट आत शेकडो खड्डे पडल्याने दुचाकी अथवा चार चाकी वाहने कशी सावरावीत, असा प्रश्न प्रवासीवर्गाला पडला आहे. त्या भागात अनेक व्यावसायिक आहेत. पण, शहरांतर्गत जाणाऱया महामार्गाच्या दुरुस्तीसाठी दाद मागण्यासाठी कोणाची हालचाल दिसत नाही. वास्तविक हा परिसर करंबळ ग्रामपंचायत क्षेत्राशी सलग्न आहे. त्यामुळे खानापूर नगर पंचायतीचा या परिसरातील रस्त्यांच्या विकासासाठी संबंध येत नसला तरी महामार्ग विकास प्राधिकरण अथवा सार्वजनिक बांधकाम खात्याने याची नैतिक जबाबदारी स्वीकारून रस्त्याची दुरुस्ती करणे अत्यंत गरजेचे आहे.
खानापूर शहराला आता बायपास राष्ट्रीय महामार्ग निर्माण झाला आहे. परंतु या मार्गावरून अद्याप अवजड अथवा लांब प्रवासाची वाहने जाण्यासाठी अडचण आहे. बायपास महामार्गाच्या रस्त्यासाठी काही ठिकाणी कामे अर्धवट असल्याने शहरांतर्गत महामार्गावरून अवजड वाहने ये-जा करत आहेत. त्यामुळे या रस्त्याची पार दुरवस्था झाली आहे. नाका परिसरात असलेल्या मुख्य ठिकाणी तसेच या नाक्मयापासून शंभर फूट अंतरावर शेतवडीच्या भागात असणारा रस्ता पुन्हा खराब झाला आहे. वर्षातून दोन-तीन वेळा या ठिकाणी खडी टाकून तात्पुरती दुरुस्ती करण्याचे नाटक केले जात आहे. यासाठी काही समाजसेवी व लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केला.
महामार्ग रस्ता दुरुस्तीसाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावेत
राष्ट्रीय महामार्ग नेहमी गजबजलेला असतो. बेळगाव पणजी-राष्ट्रीय महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. खानापूर शहराला आता बायपास राष्ट्रीय महामार्ग निर्माण झाल्याने खानापूर शहरांतर्गत असलेला जुना राष्ट्रीय महामार्ग विकासापासून वंचित आहे. गेल्या चार-पाच वर्षात या रस्त्याच्या विकासासाठी प्राधिकरणाने कोणतीच पावले उचलली नाहीत. रुमेवाडी नाका परिसरात पडलेले खड्डे अथवा मलप्रभा नदीवरील नवीन पुलाच्या दुरुस्तीसाठी कोणतीच पावले उचलली जात नाहीत. गेल्या दोन-तीन वर्षात आलेल्या महापुरामुळे नव्या पुलाचे कठडे तुटले आहेत. शिवाय रुमेवाडी नाका परिसराच्या बाजूने या पुलाला धोकाही निर्माण झाला आहे. पण याच्या दुरुस्तीचे काम प्राधिकरणाने हाती घेतले नाही. त्यामुळे परिसरातील महामार्ग रस्ता दुरुस्तीसाठी प्राधिकरणाने क्रम घ्यावा, यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावेत, अशी मागणी केली जात आहे