► प्रतिनिधी/ बेळगाव
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नूतन कार्यकारिणीची नुकतीच निवड करण्यात आली आहे. या सर्व पदाधिकाऱ्यांनी शनिवारी तरुण भारत कार्यालयाला सदिच्छा भेट देऊन सीमा सत्याग्रही स्व. बाबुराव ठाकुर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. खानापूर तालुक्यातील म. ए. समितीमध्ये एकी झाल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण असून, यामुळे सीमाप्रश्नाला बळकटी मिळणार आहे.
तरुण भारतचे संपादक जयवंत मंत्री यांनी सर्व सदस्यांचे स्वागत केले. यावेळी खानापूर तालुका म. ए. समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई, कार्याध्यक्ष यशवंत बिर्जे, सेक्रेटरी सीताराम बेडरे, प्रकाश चव्हाण, आबासाहेब दळवी, मुरलीधर पाटील, निरंजन सरदेसाई, राजाराम देसाई, संतोष पाटील, अनिल पाटील, ब्रम्हानंद पाटील यासह इतर सदस्य उपस्थित होते.