जेवणाची लज्जत वाढविण्यासाठी प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात जिरे वापरले जाते. भाजी, रायता आणि सॅलड्समध्येही ते घातले जाते. पण, तुम्हाला माहिती आहे का की जिऱ्याचा जास्त वापर केल्याने तुमच्या शरीराला खूप नुकसान होऊ शकते. एका मर्यादेपर्यंत या सर्वांचा शरीराला फायदा होतो, पण शरीरात त्यांचे प्रमाण वाढले तर अनेक समस्या होऊ शकतात.या समस्या कोणत्या आहेत ते आपण जाणून घेऊयात.
अनेकदा अनेकांना जिऱ्याची अॅलर्जी असल्याचे दिसून येते. जिरे खाल्ल्यानंतर जर तुम्हाला थोडे विचित्र वाटत असेल तर काळजी घ्या. तुम्हाला अॅलर्जीची समस्या असू शकते.
प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात गर्भधारणेचा काळ खूप सुंदर असतो. यावेळी, महिलांना जिरे खाण्यास मनाई आहे कारण जिरेचा प्रभाव खूप गरम असतो.
जर तुम्हाला मधुमेह असेल तर जिऱ्याचे सेवन फार कमी प्रमाणात करा. यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होते.
जिरे खाल्ल्यानंतर अनेकांना उलट्यांचा त्रास होऊ लागतो. म्हणूनच जिरे कमी प्रमाणातच खावेत.


previous post