राधानगरी / प्रतिनिधी
गेल्या चार दिवसां पासून राधानगरी तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे. अतिप्रमाणात पाऊस झाल्याने राधानगरी येथील संत रोहिदास गल्लीतील संगीता नामदेव चव्हाण यांचे राहते घर पूर्णपणे कोसळले आहे. त्यामुळे या कुटूंबाचे प्रापंचिक साहित्यासह तीन लाखाचे नुकसान झाले. वेळीच सावध झाल्याने कोणतेही हानी झाली नाही.
सोमवारी रात्री चव्हाण दाम्पत्य हे जेवून झोपले असताना मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास अचानकपणे घराची भिंत कोसळू लागल्याचा आवाज आला. त्यामुळे घरचे लोक जागे होऊन बाहेर पडले गल्लीतील नागरिकांनी वेळीच सावध होऊन थोडेफार साहित्य बाहेर काढले. चुकून जाग आली असती तर अनर्थ घडला असता. सकाळी याची माहिती मिळताच ग्रामपंचायतीचे सदस्य यांनी भेट देऊन चौकशी केली. शासकीय अधिकारी यांना सुट्टी असल्याने अधिकारी आले नाहीत. बुधवारी येऊन घटनास्थळी पंचनामा केला जाईल असे सांगण्यात आले. या दाम्पत्याला जास्तीत जास्त नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी होत आहे