50 हजारांचा मुद्देमाल लंपास
कळंबा परिसरात मंगळवारी चोरट्यांनी धुमाकूळ घालत एकाच रात्रीत 4 बंद घरे लक्ष करून 50 हजारांचा मुद्देमाल लंपास केला. गेल्या 8 दिवसांमध्ये 6 घरे लक्ष करून 5 लाखांच्या मुद्देमलावर चोरट्यांनी डल्ला मारला. या घटनेची नोंद करवीर पोलीस ठाण्यात झाली.
कळंबा येथील नवनाथनगर येथे संतोष लोहार यांच्या घरात भाड्य़ाने राहणारे बिराजदार नारायण पाटील हे सहकुटुंब परगावी गेले आहेत. त्यांच्या बंद घराचा कडी-कोयंडा उचकटुन चोरटय़ांनी घरातील तिजोरी फोडून पाच हजाराची रोकड व अडतीस हजाराचे सोन्याचे दागिने लंपास केले. विद्या वसंत पार्क येथे राहणारे राजेश धोंडफोडे यांच्या घरातील किरकोळ साहित्य तसेच त्यांच्या शेजारी राहणारे सर्जेराव भांदीगिरे हे सहकुटुंबियांसोबत परगावी गेल्याने चोरटय़ांना त्यांच्या घराचा कडीकोयंडा उचकटून दुसऱ्या मजल्यावर असणारे कपाट फोडले. परंतु भांदीगिरे दागिन्यांसह अन्य किमती वस्तू सोबत घेऊन गेले होते. त्यामुळे चोरटय़ांना घरात काही आढळले नाही तर प्रणव पाटील यांच्या जिममध्ये चोरट्य़ांना काही हाती लागेल नाही. चार दिवसापूर्वी कळंब्यातील शिवाजीगल्ली येथे तीन लाख वीस हजार रोकडसह दीड तोळे दागिन्यांवर डल्ला मारला होता. आजूबाजूच्या घरांना बाहेरून काडय़ा घालण्यात आल्या होत्या. अश्याच पद्धतीने नवनाथनगर, बापुरामनगर परिसरात चोरी झाली आहे. बापुरामनगर येथे चोरटे एका सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. करवीर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत कळंबा येथे पोलीस चौकी आहे मात्र अपुऱया संख्याबळ असलेने पोलीस चौकी दोन ते तीन महिन्यांपासून कधी चालू कधी बंद आहे. कळंबा व उपनगर परिसरात बिघाड झालेने अनेक सीसीटीव्ही बंद आहेत.