महाविकास आघाडी सरकारचे डोळे अन कानही बंद; भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांची टीका
कोल्हापूर प्रतिनिधी
गतवर्षीच्या महापुरातील बहुतांश पूरग्रस्तांना न मिळालेली नुकसान भरपाई व संभाव्य पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उपाययोजनांबाबत शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी भाजपने पूरग्रस्तांसह बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासर ‘टाहो मोर्चा’ काढला. यावेळी पूरग्रस्तांना भरपाई मिळालीच पाहीजे…, पूरग्रस्तांना न्याय मिळालाच पाहीजे…, महाविकास आघाडी सरकारचे करायचे काय..?अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. दरम्यान महाविका आघाडी सरकारचे डोळे व कान बसल्याने त्यांना सर्वसामान्यांचा व्यथा दिसत नाहीत, त्यामुळे ‘टाहो मोर्चा’ काढावा लागत आहे, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी येथे केली.
सकाळी साडे अकराच्या सुमारास दसरा चौक येथील राजर्षी शाहू पुतळ येथून आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चा व्हिनस कॉर्नर, बसंत-बहार टॉकीजमार्गे निघाला. आंदोलकांच्या हातात पूरग्रस्तांना भरपाई मिळालीच पाहीजे…, पूरग्रस्तांना न्याय मिळालाच पाहीजे…, पूरग्रस्तांच्या मदत वाटपातील भ्रष्टाचारी यंत्रणा हटवा…, असे फलक दिसत होते. यावेळी आंदोलकांच्या घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आल्यानंतर मोर्चाचे रुपांतर सभेत झाले.
आ. चंद्रकांत पाटील म्हणाले, पूरग्रस्तांना भोगायला लागणार्या व्यथा मांडण्यासाठी आपण मोर्चाद्वारे येथे आलो आहोत. 2019 ला आलेल्या महापुरावेळी भाजप सरकारने बाधित झालेल्या सर्व घटकांना मदत दिली. परंतु गतवर्षी आलेल्य ा महापुरातील पूरग्रस्तांना महाविकास आघाडी सरकारकडून योग्य ती मदत मिळाली नाही. माजी खासदार राजू शेट्टी यांनीही 2019 च्या शासन निर्णयाप्रमाणे भरपाई द्यावी, असे सांगितले होते.
दरम्यान आ. चंद्रकांत पाटील यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले. यामध्ये महाविकास आघाडी सरकारने 2021 च्या महापुरातील पूरग्रस्तांसाठी घोषित केलेली नुकसान भरपाई पूरग्रस्तांना द्यावी, संभाव्य पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर धरणांतील पाण्याचे नियमन करावे, पूरपरिस्थितीत नागरिकांच्या स्थलांतरासाठी असणार्या शाळांमध्ये स्वच्छतागृहांसह इतर सुविधांचा अभाव असतो; त्यामुळे त्याकडे लक्ष द्यावे, शहरातील कुंभार वसाहतींमध्ये पाणी येत असल्याने मुर्त्यांचे नुकसान होत असते, त्यामुळे त्यांना उंचावरील जागा द्यावी, अशा मागण्या करण्यात आल्या.
आंदोलनात प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती माजी अध्यक्ष महेश जाधव, माजी महापौर सुनील कदम, माजी नगरसेवक सत्यजित कदम, माजी जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके, मयुर उद्योग समुहाचे डॉ. संजय पाटील, विजय जाधव, हेमंत आराध्ये, अशोक देसाई, विठ्ठल पाटील, नाथाजी पाटील, माणिक पाटील-चुयेकर भगवान काटे, पै. संभाजी पाटील, दिलीप मेत्राणी, शिवाजीराव माने, विजय सुर्यवंशी, गायत्री राऊत, सचिन तोडकर, संदीप देसाई, पृथ्वीराज यादव, सोनाली मगदूम, विशाल शिराळकर, चंद्रकांत घाटगे, किरण नकाते, भूषण पाटील, हंबीरराव पाटील, सचिन बिरंजे, अक्षय मोरे, प्रताप देसाई, सुदर्शन सावंत, विजयसिंह खाडे-पाटील, संदीप कुंभार, अमर जत्राटे, अद्वैत सरनोबत आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते व पूरग्रस्त सहभागी झाले होते.