राधानगरी/प्रतिनिधी
काल पासून राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात व दाजीपूर अभयारण्य क्षेत्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढल्याने धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. धारण क्षेत्रात कोसळणाऱ्या पावसामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढली असून राधानगरी धरण ४८ टक्के भरले आहे.
गेल्या २४ तासात पाणी पातळी ३१७.५० फूट, पाणी साठा ३९१९.०६ इतका धरणात आहे. आज दिवसभरात १२० मी मी पावसाची नोंद करण्यात आली आहे तर एकूण पाऊस १०२१ मिमी नोंदण्यात आला आहे. बीओटीच्या खाजगी जलविद्युत केंद्रातून १,३५० क्यूसेक विसर्ग भोगावती नदी सुरू असून पाणी पात्रात वाढ झाली आहे.
हे ही वाचा : चंदगड मधील पिळणी, भोगोली बंधारे पाण्याखाली