ऑनलाईन टिम / मुंबई
काश्मिर खोऱ्यात दहशतवाद्यांनी केलेल्या अनेक हत्यांनंतरही काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित झाली नाही. भाजपने सरकारने काश्मिर खोऱ्यात राहणाऱ्या काश्मिरी पंडितांच्या जीवनात कोणतीही सुधारणा केली नाही. हिंदुत्वाच्या नावावर भाजप नेत्यांनी फक्त मते मिळवली आहेत. असा हल्लाबोल शिवसेना नेते संजय राउत यांनी माध्यमांशी बोलताना केला.
आपल्या विरोधकांवर टिका करताना संजय राऊत म्हणाले की, “आज काश्मीरमध्ये 1990 च्या दशकासारखीच परिस्थिती उद्भवली असून, या दशकामध्ये काश्मिर खोऱ्यात दहशतवाद वाढला होता आणि काश्मिरी पंडितांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाले होते.” जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द करूनही लोकांच्या जीवनात कोणतीही सुधारणा झाली नसल्यावर त्यांनी भर दिला.
पुढे बोलताना ते म्हणाले, “आज काश्मीरमध्ये तीच परिस्थिती निर्माण झाली आहे जी 1990 च्या दशकात होती. भाजपने काश्मिरी पंडितांना खोऱ्यात परत आणण्याचे आश्वासन देऊन हिंदुत्वाच्या नावावर मते मिळवली. जम्मू आणि काश्मिरमध्ये आर्ट 370 रद्द करूनही लोकांच्या जीवनात कोणतीही सुधारणा झालेली नाही.”