2000 आपदा मित्र, 68 मोटर बोट, 900 लाईफ जॅकेट्ससह यंत्रणा सज्ज : संभाव्य पूरस्थितीच्या सामन्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनचे नियोजन
प्रतिनिधी/कोल्हापूर
संभाव्य पूरस्थिती सामना करण्यासाठी अद्ययावत यंत्रसामुग्रीसह जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग सुसज्ज झाला आहे. जिह्यामध्ये 2000 आपदा मित्र व आपदा सखी, 68 मोटर बोट, सुमारे 900 लाईफ जॅकेट्स, 300 लाईफ रिंग्ज यासह फ्लोटिंग इमर्जन्सी लाईट, चेन स्वा कटर, स्ल्याब कटर आदी यंत्रसामुग्री पुरेशा प्रमाणात उपलब्ध करण्यात आली आहे.
कोल्हापूर हा अतिवृष्टी प्रमाण जिल्हा आहे. त्यामुळे सन 2005, सन 2019 व 2021 मध्ये महापुराचा प्रलय कोल्हापूरवासीयांनी अनुभवला आहे. त्यामुळे यंदाही संभाव्य पुराच सामना करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून नेटके नियोजन करण्यात आले आहे. या नियोजनासंदर्भात पालकमंत्री सतेज पाटील व जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आढावा घेतला आहे.
संपूर्ण देशाला मार्गदर्शक ठरणारे समुदायस्थित आपत्ती व्यवस्थापन हे कोल्हापूर जिह्यात केले जात आहे. जिह्यामध्ये ज्या भागांमध्ये महापूराची आपत्ती येते, त्या भागातील तरुण-तरुणींना आपत्ती व्यवस्थापनाच्या कामासाठी प्रशिक्षित करण्यात आले आहे. अशा सुमारे 2000 आपदा मित्र व आपदा सखी या स्वयंसेवकांची फौज सज्ज ठेवण्यात आली आहे. त्याचबरोबर संभाव्य महापुराला तोंड देऊन बचाव कार्य करण्यासाठी जिह्यामध्ये 68 मोटर बोट, सुमारे 900 लाईफ जॅकेट, 300 लाइफ रिंग्ज, फ्लोटिंग इमर्जन्सी लाईट, चेन स्वा कटर, स्ल्याब कटर अशी सुसज्ज यंत्रसामुग्री पुरेशा प्रमाणात उपलब्ध करण्यात आली आहे.
सार्वजनिक उद्घोषणा प्रणालीचा होणार प्रभावी वापर
सार्वजा†नक उद्घोषणा प्रणालीचा देशातील पहिलाच प्रयोग कोल्हापूर जिह्यामध्ये राबविण्यात आला आहे. जिह्याच्या कानाकोपर्यातील नागरिकांपर्यंत अत्यंत विश्वासार्ह माहिती पोहोचविण्यासाठी या यंत्रणेचा उपयोग होत आहे. या यंत्रणेचा चांगला वापर गतवर्षी आलेल्या महापुरामध्ये झाला. येणार्या पावसाळ्यात व संभाव्य पूरपरिस्थितीमध्ये ही या यंत्रणेचा प्रभावीपणे वापर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात येणार आहे.
संभाव्य पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील व जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज आहे. पावसाळा व संभाव्य पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सर्व नियोजन आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून झाले आहे. आवश्यक ती सर्व यंत्रसामुग्री उपलब्ध करण्यात आली आहे.
-प्रसाद संकपाळ, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी