कानूर वार्ताहर
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कानूर खुर्द येथे ग्रामपंचायतीचा ध्वजारोहण रोहिणी रवींद्र कांबळे यांच्या हस्ते संपन्न झाला. कानूर खुर्द येथे विधवा महिलेच्या हस्ते ध्वजारोहण करण्याचा हा कानूर खुर्द येथील पहिलीच घटना असून रोहिणी कांबळे यांचे पती रवींद्र कांबळे यांचा कोरोना 19 महामारीत मृत्यू झाला होता. त्यामुळे कांबळे कुटुंबावर दुःखाचे सावट होते स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 13 ते 15 ऑगस्ट पर्यंत सर्व सहकारी कार्यालयात ध्वजारोहण होत असून अमृत महोत्सवातील पहिल्या दिवशी ध्वजारोहणाचा सन्मान एका विधवा आणि दलित महिलेला देऊन ग्रामपंचायतिने येथील महिलांचा सन्मान केला आहे. याचे परिसरात कौतुक होत आहे. यावेळी सरपंच निवृत्ती पाटील उपसरपंच लक्ष्मण चव्हाण तंटामुक्त अध्यक्ष तुकाराम गावडे ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक डी.डी. नाडेकर, ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते