माझी वसुंधरा अभियान अंतर्गत उत्कृष्ट काम केल्याबद्दल सन्मानपत्र देऊन गौरव
प्रतिनिधी/कोल्हापूर
राज्यातील माझी वसुंधरा अभियान अंतर्गत उत्कृष्ट काम करणारे जिल्हाधिकारी म्हणून कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
वातावरणीय बदलाचे दुष्परिणाम रोखण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने विविध उपायोजना केल्या जात आहेत.
याचाच एक भाग म्हणून समृद्ध पर्यावरण निर्माण करण्यासाठी ’माझी वसुंधरा अभियान 2.0′ हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राबविण्यात येत आहे. याअंतर्गत सर्वोत्तम कामगिरी करणाऱया स्थानिक संस्था, विभागीय व जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांचा सन्मान जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आबासाहेब जऱहाड, सदस्य सचिव अशोक शिनगारे आदी उपस्थित होते.
माझी वसुंधरा अभियान अंतर्गत विविध पातळ्यांवर उत्कृष्ट काम करणाऱया संस्था आणि अधिकाऱयांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यामध्ये अमृत शहरांतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त अभिजित बांगर, उत्कृष्ट विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे, उत्कृष्ट जिल्हाधिकारी पातळीवरील पुरस्कार कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार, कोल्हापूर, उत्कृष्ट जिल्हा परिषद पातळीवर मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर आणि आशिष येरेकर, अहमदनगर आदींसह विविध संस्था आणि अधिकाऱयांचा समावेश आहे.