मृत्यूचे कारण अस्पष्ट
गोकुळ शिरगाव/प्रतिनिधी
येथील बुवाचामठ, विमानतळ कंपाउंड जवळील दुर्गम भागात असलेल्या विहिरीमध्ये पवन सुनील हजारे (वय वर्षे २८ ,रा.प्लॉट नंबर ५० गणेश कॉलनी, गणेश मंदिर जवळ, उंचगाव ता.करवीर) या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. सडलेल्या अवस्थेत मृतदेह सकाळी फिरावयास गेलेल्या नागरिकांना आढळून आला. सदर मृत्यूची वर्दी मधुसूदन शरद वरुटे (रा. मनेरमाळा) यांनी गोकुळ शिरगाव पोलिसात दिली. सदर मृत्यूचे कारण खून की आत्महत्या हे समजू शकले नाही. पवन हजारे याचे उंचगाव येथे इस्त्री व लॉन्ड्री चा व्यवसाय असून बुधवार (ता. २२ जून) पासून बेपत्ता होता. अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल इदे करीत आहेत.