कसबा बीड /प्रतिनिधी
गेल्या आठवड्यापासून सुरू असणाऱ्या संततधार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुराच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. मंगळवारी सायंकाळी 7.30 वाजता कोगे- कुडित्रे पुलावर पाणी आले आहे. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या कुंभी कासारी साखर कारखान्याचे कामगार, शालेय व महाविद्यालय विद्यार्थी, तसेच प्रवाशांची गैरसोय झाली आहे. पर्यायी मार्ग म्हणून कुडित्रेला जाण्यासाठी बालिंगामार्गे वाहतूक सुरू आहे.
अधिक वाचा- महे- कसबा बीड पुलावर पाणी; वाहतूक बंद
कोगे- कुडित्रे पुलावर मृत गवा रेडा अडकलेला आढळून आला. मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणापातळी वाढून पूर नियंत्रण रेषेबाहेर जात आहे. वाढत्या पाण्याबरोबर जनावारे आणि इतर वस्तू वाहत येत असतात. आज कोगे- कुडित्रेदरम्यान असणाऱ्या या नवीन पुलावर पुर्ण वाढ झालेला गवा रेडा तरंगताना दिसत आहे.
पूर पाहण्यासाठी नागरिकांनी पाण्यात उतरू नये असे गावच्या सरपंच अंबाबाई पाटील यांच्याकडून सांगण्यात आले आहे.