कोल्हापूर प्रतिनिधी
छत्रपती ताराराणी मंच आणि महात्मा गांधी विचार संरक्षण मंचतर्फे ‘आधुनिक भारताचे शिल्पकार पंडीत जवाहरलाल नेहरू : समज-गैरसमज’ या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार 4 डिसेंबर रोजी येथील राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये सकाळी 10 वाजता हे व्याख्यान होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार विचारवंत संजय आवटे या व्याख्यानात मार्गदर्शन करणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. डी. यु. पवार भूषविणार आहेत. यावेळी आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील उपस्थित राहणार आहेत.
गैरसमज व समज जाणून घेण्यासाठी या
स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत नेहरू यांच्याबद्दल गैरसमज पसरविले जात आहेत. खरोखरचे त्यांचे व्यक्तीमत्व कसे होते?, त्यांनी कशा पद्धतीने देश उभारणीचे कार्य केले? यासह त्यांच्या विविध पैलूंवर संजय आवटे प्रकाशझोत टाकणार आहेत. गैरसमज व समज जाणून घेण्यासाठी या व्याख्यानाचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाच्या माजी राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. भारती पाटील, माजी नगरसेविका भारती पवार, सामाजिक कार्यकर्त्या सीमा पाटील, शिवाजी विद्यापीठ सिनेट सदस्य अभिषेक मिठारी, प्रभाकर पाटील यांनी केले आहे.