शाहुवाडी प्रतिनिधी
भाच्याचे जावळ काढून शाहूवाडीकडे येत असताना कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गीवरील जुळेवाडी (ता. शाहूवाडी ) खिंडीच्या घाटात मोटारसायकल घसरून झालेल्या अपघातात दोघे युवक ठार झाल्याची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली असून. या अपघातात ठार झालेल्या युवकांची नांवे अशी ऋतूराज सुनील कुंभार वय २७ (रा . बोरपाडळे ता. पन्हाळा ) विराज पांडुरंग कुंभार वय ३२ ( रा. ओकोली ता. शाहू वाडी) घटना रविवार दुपारी घडली.
घटना स्थळावरून मिळालेली महितीनुसार ओकोली येथील युवक विराज कुंभार याची सख्खी बहिण बोरपाडळे गावात दिली आहे. तिच्या मुलाचे आज जावळ काढण्याचा कार्यक्रम होता. विराज कुंभार सकाळी आपला मित्र ऋतुराज कुंभार या ला सोबत घेऊन मोटारसायकलवरून बोरपाडळे येथे गेले होते. कार्यक्रमानंतर जेवण करून शाहूवाडीकडे जात असताना कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर जुळेवाडी खिंडीच्या घाटात रस्त्यात पडलेल्या नारळाच्या पिशवी वरून मोटार सायकल घसरून ऋतुराज कुंभार व विराज कुंभार रस्त्यावर पडल्याने जागीच ठार झाले होते.
घटना स्थळी नागरीकांनी मोठी गर्दी केली होती. दोघांना ॲम्ब्यूलन्स मधून सीपीआर रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले. सीपीआर रुग्णालयात दोघांच्या नातेवाईकांनी गर्दी केली होती. ऋतुराज कुंभार मलकापूर येथे कंत्राटी लाईनमन म्हणून महावितरण कंपनीकडे कामाला होता. मनमिळावू स्वभावाचा असल्याने त्याचा मित्र परिवार मोठा होता. कर्त्यव्य दक्ष लाईनमन म्हणून त्याला ओळखले जात होते. या घटनेने बोरपाडळे व ओकोली गावावर शोककळा पसरली आहे.