प्रतिनिधी/प्रयाग चिखली
पंचगंसून स्थलांतराला प्राधान्य दिले. दिवसभरात सुमारे. ४०-५० टक्के ग्रामस्थांनी आवश्यक संसार साहित्य बरोबर घेतले तर उर्वरित संसार साहित्य राहत्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर गुंडाळून ठेवून मिळेल त्या वाहनाने सुरक्षित स्थळी स्थलांतरण केले. प्रयाग चिखलीच्या बहुतांश नागरिकांनी पुनर्वसन झालेल्या सोनतळी ठिकाणी आसरा घेतला आहे. गुरुवारी रात्रीपर्यंत चिखलीतील सुमारे अडीच ते तीन हजार लोकांनी तर आंबेवाडीतील ८०० वर लोकांनी स्थलांतर केले.
महापुराचे पाणी वाढत असताना पावसाचाही जोर वाढत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून प्रयाग चिखली व आंबेवाडी ग्रामस्थांनी गुरुवारी पहाटे पासून स्थलांतर सुरूच होते. सुमारे १३०० कुटुंबापैकी ९० टक्के कुटुंबाची बाहेर राहण्याची स्वतः सोय केलेली आहे. अवघ्या दहा टक्के लोकांना शासनाकडून अपेक्षा असल्याचे ग्रामपंचायतीमधून सांगण्यात आले. महापूर आला की जनावरांची मोठी अडचण होते गावांमध्ये हजार वर दुभती जनावरे आहेत त्यापैकी बहुतांशी जनावरांचे स्थलांतर सोनतळी व इतर भागात करण्यात आले आहे.
हे ही वाचा : Kolhapur : हिरण्यकेशी नदीवरील ऐनापूर, निलजी बंधारे पाण्याखाली
गावाला संपर्क साधता येणारे तीनही रस्ते अद्याप खुले आहेत. या रस्त्यावर पुराचे पाणी अजून आलेले नाही. क्षेत्र प्रयाग येथील दत्त मंदिरामध्ये पाणी शिरले आहे. मात्र येथील रस्त्यावर अद्याप पाणी आलेले नाही. शासनाच्या सर्व यंत्रणा सज्ज आहेत. गुरुवारी सकाळी करवीच्या तहसीलदार शितल मुळे भांबरे बीडीओ उगले तालुका आरोग्य अधिकारी जी. डी. नलवडे, पाणीपुरवठा विभागाचे एस. के. बारटक्के, बांधकाम विभागाचे अमित पाटील, गटशिक्षणाधिकारी समरजीत पाटील, कृषी अधिकारी सुनील रुपनर, तलाठी श्रीकांत नाईक, ग्रामसेवक गिरीगोसावी यांचा समावेश असलेल्या टीमने गावांमध्ये फिरून लोकांना स्थलांतराबाबत आव्हान केले. शिवाय ज्या ठिकाणी मोठ्या संख्येने ग्रामस्थ स्थलांतरित होत आहे त्या सोनतळी ठिकाणी स्थलांतरित लोकांची व्यवस्था होईल याबाबत पहाणी करून यंत्रणा राबवली.
प्रयाग चिखलीच्या स्थलांतरित होणाऱ्या लोकांना सोनतळी येथील समाज मंदिर प्राथमिक शाळा व आश्रम शाळा या ठिकाणी सोय करण्यात आली आहे. तर आंबेवाडी गावच्या स्थलांतरित लोकांना जुना बुधवार पेठेतील कल्याणी हाॅल, जैन मठ, विवेकानंद हायस्कूल या ठिकाणी राहण्याची सोय शासन पातळीवर करण्यात आल्याचे सरपंच सिकंदर मुजावर यांनी सांगितले.
दरम्यान अजूनही पुराची कोणतीही गंभीर अध्याप तरी निर्माण झालेली नाही मात्र संभाव्य धोका ओळखून ऐनवेळी कोणतीही गंभीर परिस्थिती निर्माण झाली तर शासनाकडून आम्हाला रेस्क्यू बोट उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी चिखलीच्या सरपंच उमा संभाजी पाटील यांनी केली आहे.