राधानगरी / प्रतिनिधी
राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला असला तरी दाजीपूर अभयारण्य क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने धरणाच्या पाणीसाठय़ात वाढ होत आहे. गुरुवारी दिवसभरात 112 मिमी पावसाची नोंद झाली आहे तर 7 जुलैअखेर 833 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. बीओटीच्या जलविद्युत केंद्रातून 1200 क्यूसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदी पात्रात सुरू आहे. सध्या धरणत पाणीसाठा 3258,93 दलघफू (3.25 टीएमसी) इतका आहे.
अधिक वाचा- है…तैय्यार हम…संभाव्य पुरपरिस्थितीसाठी कोल्हापुरातील संघटना सज्ज