धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर
राधानगरी / प्रतिनिधी
गेल्या दोन दिवसापासून राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात व दाजीपूर परिसरात पावसाचा जोर वाढला असून धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. वाठत्या पावसामुळे धरणात 28.34 पाणीसाठा उपलब्ध झाला आहे
गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी जून महिन्यात पावसाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे धरणातील पाणीसाठा कमी झाला होता. मात्र जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाचा जोर वाढल्याने पाणी पातळीत वाढ होत आहे. आज दिवसभरात 43 मीमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तर जून ते 4 जुलै दरम्यान 482 मी मी पावसाची नोंद करण्यात आली. खाजगी वीज निर्मिती केंद्रातून 1000 क्यूसेकने विसर्ग सुरू असून पावसाचे प्रमाण वाढल्याने ओढ्यानाल्याच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे भोगावती नदी पात्रात पाण्याची पातळी वाढली आहे. असाच पावसाचा जोर राहिल्यास जुलै अखेरीस धरण भरण्याचा अंदाज पाटबंधारे विभागाने वर्तविला आहे.