कोल्हापूर / प्रतिनिधी
देशभरासह राज्यभरात उत्सुकता लागून राहीलेल्या कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या ‘उत्तर’ला काँग्रेसने प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी भाजपच्या सत्यजीत कदम (नाना) यांना पराभूत करत कांग्रेसचा गड राखला.
कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीत २६ व्या फेरीअखेर महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री १८,७५० मतांनी विजयी झाल्या. २६ व्या फेरीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना १ हजार ४५९ मते मिळाली तर भाजपच्या सत्यजित कदम यांना १ हजार ३०३ मते मिळाली आहेत. आतापर्यंत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना ९६,१२६ मते मिळाली आहेत. तर भाजपचे सत्यजित कदम यांना ७७,४२६ मते मिळाली आहेत. चुरशीच्या झालेल्या लढतीत अखेर जयश्री जाधव १८ हजार ८०० मतांनी विजयी झाल्या.