वडील, आजी-आजोबांसह आठजणांविरूध्द गुन्हा
प्रतिनिधी / लांजा
तालुक्यातील कोर्ले येथील आर्या राजेश चव्हाण या 7 वर्षे बालिकेच्या मृत्यू प्रकरणाला वेगळीच कलाटणी लागली आह़े आत्महत्या केल्याचे भासवण्यात आलेल्या या प्रकरणात आर्या हिच्या घरातील नातेवाईकांनी गळा आवळून खून केल्याचे पोलिसांच्या तपासामध्ये उघड झाले आह़े त्यानुसार लांजा पोलिसांनी आर्याचे वडील, आजी-आजोबांसह 8 जणांविरूद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला आह़े
तालुक्यातील कोर्ले सहकारवाडी येथील आर्या राजेश चव्हाण या बालिकेचा मृतदेह 11 जून रोजी राहत्या घरी गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आल़ा टिव्हीवरील मालिका बघून आर्या हिने आत्महत्या केल्याचे नातेवाईकांकडून सांगण्यात आले होत़े त्यानुसार आर्या हिचे वडील राजेश चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पोलिसांनी आर्या हिने आत्महत्या केल्याने आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. सुरूवातीपासून संशयाच्या भोवऱयात असलेल्या घटनेच्या तपास पोलिसांकडून करण्यात येत होत़ा नुकतेच जिल्हा पोलीस अधीक्षक ड़ॉ मोहितकुमार गर्ग यांनी आर्या हिच्या राहत्या घरी भेट दिली होत़ी
पोलिसांकडून करण्यात आलेल्या तपासामध्ये, आर्या हिचा माया हीची सावत्र सासू सुनंदा सुभाष चव्हाण व चुलत नणंद अनिता नागेश चांदेकर यांनी आर्या हिचा घरात गळा आवळून खून केला. यानंतर आत्महत्या भासवण्यासाठी भिंतीला लटकवल्याचे पोलीस तपासात समोर आल़े दरम्यान या प्रकरणी लांजा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माया राजेश चव्हाण (फलटण जि. सातारा) हिचे 2005 मध्ये राजेश सुभाष चव्हाण (रा. कोर्ले-लांजा) याच्याबरोबर लग्न झाले होते. राजेश चव्हाणला दारूचे व्यसन होते. तो दररोज दारू पिऊन मायाच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला शिवीगाळ तसेच मारहाण करत असे. दरम्यान या दोघांनाही 3 मुली झाल्या होत्या. या तीन मुलींमध्ये प्रिया (18), अनुजा (12) व आर्या (7) यांचा समावेश आहे. राजेश याच्या सततच्या त्रासाला कंटाळून माया ही तीनही मुलींना घेऊन ती आपल्या माहेरी फलटण येथे रहायला गेली होती. याचदरम्यान राजेशने काजल हिच्याशी दुसरा विवाह केला होता. दरम्यान आपण दुसरे लग्न केल्याची माहिती पहिल्या पत्नी म्हणजे मायाला मिळाली होती. पहिली पत्नी हयात असताना दुसरे लग्न केले. त्यामुळे आपल्यावर गुन्हा दाखल होईल, या भीतीपोटी राजेश याने माया हिच्याशी चांगले वागण्याचे नाटक करून आपल्या दोन्ही मुली आर्या व अनुजा यांना घेऊन तो कोर्ले येथे रहायला आला होता. मात्र कोर्ले येथे आल्यानंतर या दोन्ही मुलींना आजी सुनंदा व सावत्र आई काजल हिने त्रास देण्यास सुरुवात केली होती. 11 जून रोजी रात्री 9 च्या दरम्यान माया हीची सासू सुनंदा सुभाष चव्हाण व चुलत नणंद अनिता नागेश चांदेकर यांनी आर्या हिचा घरात गळा आवळून खून केला. यासाठी या दोघींना इतर सहाजणांनी सहकार्य केले. या प्रकरणी लांजा पोलिसांनी माया राजेश चव्हाण हिची सवत सासू सुनंदा सुभाष चव्हाण, नणंद अनिता नागेश चांदेकर, सासरा सुभाष नारायण चव्हाण, दीर दीपक सुभाष चव्हाण, सावत्र दीर सुरज सुभाष चव्हाण, सवत काजल राजेश चव्हाण, तिचे वडील सर्जेराव नारायण मोहिते (राजापूर) आणि पती राजेश सुभाष चव्हाण अशा एकूण आठजणांवर भादंवि कलम 302 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत अधिक तपास लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे हे करत आहेत.