क्रांतिसिंह नाना पाटील यांना भारतरत्न पुरस्कार दयावा : भिलवडी येथे तिरंगा यात्रेचे कॉग्रेस कार्यकर्त्यानी केले जल्लोषात स्वागत
भिलवडी/प्रतिनिधी
राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची ज्या ज्या वेळी राज्यात भाषने झाली त्या त्या वेळी त्यांना पक्ष प्रमुख म्हणूनच संधी मिळाली मुख्यमंत्री म्हणून नव्हे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली. या अमृत महोत्सवाचा विसर मुख्यमंत्र्यांना पडला असून या अमृत महोत्सवाचा जागर म्हणून देशासाठी बलिदान दिलेल्या थोर वीरांचे स्मरण होण्यासाठी ही तिरंगा यात्रा काढत असून दलित महासंघाच्या तिरंगा यात्रेमध्ये सातारच्या प्रति सरकारचे स्मारक झालेच पाहिजे, तसेच क्रांतिसिंह (नाना) पाटील यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे अशी आग्रही मागणी दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रा. मच्छिंद्र सकटे यांनी केली. ते भिलवडी येथील तिरंगा यात्रेच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
अधिक वाचा : मंकीपॉक्सचा आजार; नेमकी काय आहे परिस्थिती…
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांमध्ये ज्यांनी देशासाठी बलिदान दिले त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दलित महासंघाच्या वतीने तिरंगा यात्रा सुरू करण्यात आली आहे. क्रांतिकारकांनी देशासाठी त्याग केला. नव्या भारताचे स्वप्न पाहिले.
क्रांतीसिंह (नाना) पाटील, जी. डी. (बापू) लाड, नागनाथ (आण्णा) नायकवडी, अशा थोर वीरांनी देशासाठी रक्त सांडले आहे. आज देशातील विविध भागात स्वातंत्र्य सैनीकांनी देश संरक्षणासाठी बिलिदान दिले आहे. झाशीच्या राणीने इतिहास घडविला. छत्रपती शिवाजी महाराजा नंतर क्रांतीकारी चळवळीतील थोरा मोठ्यांनी देश टिकविला परंतु यांच्यावर कोणी बोलण्यास तयार नाही, असेही ते यावेळी म्हणाले.