अध्याय अठरावा
सात्विकाच्या घरच्या अन्नाचं महत्व सांगताना भगवंत म्हणाले, संन्याशाने सात्विकाच्या घरचे अन्न सेवन केले असता त्याच्या अंगी प्रत्येक घासाला शुद्धसत्त्वपणा उत्पन्न होतो. तेणेकरून साधकाची अनिवार सत्त्वशुद्धी होते व वासनाही निःशेष नाहीशी होऊन आत्मशांती प्रगटते. निःशेष वासना गेली म्हणजे जग सत्यत्वाने दिसतच नाही मग विषयासक्ती कुठून येणार ? तेव्हा अर्थातच उत्कट वैराग्य उत्पन्न होते. संन्याशाने दृश्य जगाला सत्य मानू नये कारण ते नाश पावते. कोठेही आसक्ती नसावी इहलोकी किंवा परलोकी काहीही करण्याची इच्छा बाळगू नये.
उद्धवा, या लोकामध्ये जे जे म्हणून दिसते ते ते नाश पावते, हे सर्वांना प्रत्यक्ष दिसतेच परंतु विषयाला वश होऊन व त्यांत गुंतून पडून अज्ञानी लोक भुलतात. पण शुद्ध भिक्षेच्या प्राप्तीने, संन्याशाची वृत्ती शुद्धसत्त्वात्मक झाली की, त्याला विषय हे सत्यत्वाने दिसतच नाहीत.
ह्याप्रमाणे विषयाचे ज्याला मिथ्या भान असते, त्याचे मन विषयासक्त होत नाही. म्हणून संसाराच्या किंवा स्वर्गाच्या, दोहोंच्याही साधनांना तो स्पर्श करीत नाही. ह्याप्रमाणे जो विषयविरक्त असतो, त्याचेच परमार्थाकडे चित्त लागून राहते आणि तो निजबोधाने परमार्थयुक्त होऊन जगामध्ये अनासक्तपणेच हिंडत असतो.
त्याच्या निजबोधाचे लक्षण म्हणजे प्रपंचाचे मिथ्यत्व आणि आत्मस्वरूपाने येणारे समाधान श्रीकृष्ण स्वतः सांगत आहेत. संन्याशाने आत्म्यामध्ये दिसणारे मन, वाणी आणि प्राण यांचा संघात असलेले हे जग म्हणजे माया आहे, असा निश्चय करून त्याचा त्याग करावा व आत्मस्वरूपात स्थिर राहून त्याचे कधीही स्मरण करू नये. मन, वाणी व प्राण ह्यांच्या प्रवाहात अहंकारामुळे जग मिथ्या मायिक आहे असाच भास होतो. दोरामध्ये सर्पाचा भास, शिंपीमध्ये रुप्याचा भास, किंवा उन्हामध्ये मृगजळाचा भास होतो, त्याप्रमाणेच चिन्मात्रब्रह्मस्वरूपामध्ये जगाचा आभास होतो. स्वप्नातील व्यवहार जसा असतो, त्याप्रमाणेच हे सारे चराचर भासते. अशा प्रकारे हे सारे खरोखर मिथ्या आहे अशी खात्री झाली म्हणजे मग पुढे स्मरणाविषयी आदर राहात नाही. जो चांगला जागा होतो, त्याचे मन स्वप्नातील सुखाची काही इच्छा करीत नाही त्याप्रमाणे स्वस्वरूपामध्ये ज्याचे मन स्थिर झाले तो कोणत्याही प्रपंचवस्तूचे स्मरण करीत नाही. आता ‘हंस’ व ‘परमहंस’ ह्यांचे धर्मही यथानुक्रमाने सांगतो ऐक. संन्यासही चार प्रकारचा आहे हे लक्षात ठेव. एक ‘हंस’ व दुसरा ‘परमहंस’ तिसरा ‘बहूदक’ आणि चौथा त्याहून भिन्न आहे त्यास ‘कुटीचक’ असें म्हणतात. कर्म टाकून संन्यासी झाला, पण मनामध्ये ध्यानही नाही आणि ज्ञानही नाही तसेच अन्नासाठी आपल्या गावातच राहतो, त्याला ‘कुटीचक’ असे म्हणतात.
कुटीचक वार्धक्मयामध्ये अग्निहोत्र आणि स्त्री ही टाकून देतो, परंतु शिखासूत्र टाकीत नाही, म्हणून त्याला गायत्रीमंत्राचा अधिकार असतो. नित्यशः पुत्राच्या घरीच भिक्षा घ्यावयाची, त्याच्याच दारात पर्णकुटी बांधायाची, आणि मठी सोडून लांब कोठे जावयाचे नाही, म्हणून त्याचे नांव ‘कुटीचक’ होय. संन्यासाचा पुढला प्रकार बहुदक होय. तो शिखासूत्राचा त्याग करून, त्रिदंडाचे ग्रहण करून, कर्माचरण करतो पण ज्ञानाचे रक्षण मुळीच समजत नाही. निस्सीम वैराग्य नाही, ज्ञानावरही नि÷ा चांगली नसते आणि कर्मठ मात्र अतिशय. आता विविदश संन्यासी म्हणजे काय ते सांगतो. वैराग्याच्या निर्धाराने ज्ञानसाधनाचा विचार करणारा, शिखासूत्र व कर्म यांचा त्याग करून आत्मचिंतनावरच ज्याची नि÷ा असते. त्याला ‘विविदिष’ संन्यासी असे म्हणतात आणि अशा दृढ नि÷sने जो वागतो, त्याला ‘हंस’ असे म्हणतात. कोणी यालाच ‘परमहंस’ ही म्हणतात. आता परमहंसाचे लक्षण ऐक. तो ज्ञाननि÷sने परिपूर्ण असतो. म्हणून शांतीही त्याच्या दारात राबत असते. तो तिनी गुण मिथ्या मानीत असतो. कर्माची वार्ता तो मिथ्याच मानतो आणि आपण नित्य निष्कर्मच आहो असे तो जाणतो.
क्रमश ः