अपुऱया पाठय़पुस्तकांमुळे बोजवारा : शिक्षकांसमोर काय-कसे शिकवायचे याचा पेच : पुस्तके उपलब्ध करण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
शालेय शिक्षण विभागाचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी खेळ सुरू आहे. शाळा सुरू होऊन वीस दिवस उलटले तरी अद्याप पाठय़पुस्तके उपलब्ध झालेली नाहीत. सरकारने दिलेला ‘इंदधनुष्य’ हा प्रकल्प शिकवून पूर्ण झाला तरी पुस्तके नसल्यामुळे आता पुढे काय करायचे? काय शिकवायचे? असा प्रश्न शिक्षकांसमोर आहे. त्यामुळे मागचीच उजळणी घेण्याची वेळ शिक्षकांवर आली आहे. हे एकीकडे सुरू असले तरी दुसरीकडे मात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. आधीच मागील दोन वर्षात कोरोनामुळे नुकसान झाले असताना आता त्यात ढिसाळ नियोजनामुळे भर पडली आहे.
यावषी शैक्षणिक वर्षाला पंधरा दिवस आधी म्हणजे 16 मेपासून सुरुवात झाली. विद्यार्थी शाळेपर्यंत आल्यानंतर त्यांना इंद्रधनुष्य हा पंधरा दिवसांचा अभ्यासक्रम देण्यात आला होता. याद्वारे विद्यार्थ्यांना अधिकाधिक उपक्रम देण्यात आले होते. मूल्याधारित प्रकल्प देऊन मागील पंधरा दिवसात शिक्षण देण्यात आले. 1 जूनपासून अभ्यासक्रमाला सुरुवात करण्यात येणार होती. परंतु, अद्यापही 50 टक्के पाठय़पुस्तके उपलब्ध नसल्याने पुढे काय शिकवायचे, असा प्रश्न आहे.
मागील दोन वर्षात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी ‘अध्ययन पुनर्प्राप्ती’ हा उपक्रम यावषी संपूर्ण वर्षभर राबविला जाणार आहे. यासाठी शिक्षण विभागाने प्रत्येक वर्गवार मार्गदर्शक पुस्तिका शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी तयार केल्या आहेत. परंतु, शाळा सुरू होऊन वीस दिवस उलटले तरी अद्याप या मार्गदर्शक पुस्तिका विद्यार्थी व शिक्षकांपर्यंत पोहोचलेल्याच नाहीत. सरकारी व अनुदानित शाळांना अध्ययन पुनर्प्राप्तीविषयी प्रशिक्षण दिले जात असले तरी खासगी शाळा मात्र यापासून अद्याप दूरच आहेत.
अध्ययन पुनर्प्राप्ती प्रकल्प राबविले जाणार असल्याने शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले. परंतु, बऱयाच शिक्षकांना याविषयी काहीच माहिती नाही. प्रशिक्षण काही मोजक्मयाच शिक्षकांनी घेतल्याने जुन्याच पद्धतीने शिक्षकांनी अभ्यासक्रमाला सुरुवात केली आहे. सरकारी शाळांमध्ये तर गोंधळाची स्थिती असल्याने शिक्षकांकडूनही नाराजी व्यक्त होत आहे.
अद्याप अडीच लाख पुस्तकांची गरज
बेळगावमध्ये एकूण 5 लाख 64 हजार 318 पाठय़पुस्तकांची आवश्यकता आहे. यापैकी जून प्रारंभापर्यंत 3 लाख 16 हजार 583 पाठय़पुस्तके उपलब्ध झाली आहेत. ही पाठय़पुस्तके टप्प्याटप्प्याने शाळांना दिली जात आहेत. उर्वरित 2 लाख 47 हजार 735 पाठय़पुस्तकांची अद्याप गरज आहे. ही पाठय़पुस्तकेदेखील लवकरच बेळगावमध्ये येतील, असा अंदाज शिक्षण विभागातील अधिकाऱयांकडून व्यक्त केला जात आहे.