प्रतिनिधी./ वाळपई
गोव्यामध्ये मोठय़ा प्रमाणात हिरव्या चाऱयाची कमतरता भासू लागलेली आहे. याचा थेट परिणाम दुधाच्या उत्पादनावर होऊ लागल्याचे चित्र आहे. गोव्यामध्ये हिरवा चारा मिळणे दुरापास्त बनत चालला यामुळे सध्यातरी दूध उत्पादकांसमोर मोठय़ा प्रमाणात चिंतेचा विषय निर्माण झालेला आहे.
हिरव्या चाऱयाची शिवाय दुधाचे उत्पन्न मिळणे अवघड आहे. जोपर्यंत हिरवा चारा उपलब्ध होत नाही तोपर्यंत दूध उत्पादकांना समोर तारेवरची कसरत सुरू राहणार आहे.
याबाबतची माहिती अशी की गोवा राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी कामधेनू योजनेअंतर्गत गोव्याच्या दुधाचे उत्पादन वाढविण्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला. कामधेनू योजना अमलात आल्यानंतर अनेकांनी दुधाचे उत्पादन वाढविण्याच्या दृष्टिकोनातून व व्यवसाय सुरू करण्याच्या उद्देशाने गाई घेतल्या. गेल्या पंधरा वर्षांपासून ही योजना अत्यंत प्रभावीपणे सुरू आहे. मात्र गेल्या जवळपास एक वर्षापासून गोव्यातील दूध उत्पादकांना हिरव्या चाऱयाची कमतरता भासू लागलेली आहे. यामुळे अनेकांसमोर गंभीर स्थिती निर्माण झाली असून अनेक दूध उत्पादकांनी आपल्या गाई विकून आपला धंदा बंद केल्याची माहिती हाती आलेली आहे.
याबाबत दूध उत्पादकांनी दिलेल्या माहितीनुसार कर्नाटक भागातून हिरव्या चाऱयाची व्यवस्था करण्यात येत होती. खानापुर, जांबोटी ,बेळगाव आदी परिसरातून मोठय़ा प्रमाणात हिरवा चारा गोव्यामध्ये येत होता. मात्र सदर ठिकाणी कर्नाटक सरकारने अशा प्रकारची योजना अमलात आणल्याने सदर भागामध्ये मोठय़ा प्रमाणात शेतकऱयांनी दुधाचे उत्पादन सुरू केले. यामुळे गोव्यात येणारा हिरवा चारा सध्यातरी पूर्णपणे बंद झालेला आहे.
हिरव्या चाराच्या माध्यमातून दुधाचे उत्पादन वाढत असते.
गोवा सरकारच्या पशुवैद्यकीय खात्यातर्फे हिरवा चारा निर्मिती संदर्भाची योजना आहे. मात्र सदर योजना सध्यातरी गोव्यात चांगल्या प्रकारे काम करीत नसल्याचे स्पष्ट झाले आहे .यासाठी पशुवैद्यकीय खात्याने यासंदर्भात प्रोत्साहन देणे अत्यंत गरजेचे आहे .त्यासंदर्भात व्यवस्थित व्यवस्थापन होत नसल्यामुळे गोव्यामध्ये शक्मय असताना सुद्धा हिरव्या चाऱयाची निर्मिती होत नसल्यामुळे त्याचे थेट परिणाम दूध उत्पादनावर होताना दिसत आहेत.
गोव्याच्या अनेक तालुक्मयांमध्ये पाण्याची व्यवस्था आहे. त्याचप्रमाणे अनेक स्तरावर पडीक जमिनी आहेत. या जमिनीमध्ये हिरव्या चाऱयाची निर्मिती केल्यास त्यातून चांगल्या प्रकारे आर्थिक लाभ होऊ शकतो. मात्र यासाठी सरकारने हिरव्या चाऱयाची योजना अधिक सुटसुटीत करावी अशा प्रकारची मागणी दूध उत्पादकांनी केलेली आहे.
सत्तरी तालुक्मयासारख्या अनेक भागांमध्ये हिरव्या चाऱयाची निर्मिती चांगल्या प्रकारे होऊ शकते. कारण जलसिंचन खात्याच्या माध्यमातून सत्तरी तालुक्मयातील जवळपास सर्वच नद्यावर अनेक ठिकाणी बंधारे घातलेले आहेत. पाणी आडवा पाणी जिरवा या योजनेअंतर्गत मोठय़ा प्रमाणात पाण्याचा साठा होत आहे. यामुळे या पाण्याचा साठा हिरवा चारा निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून वापरल्यास सध्या निर्माण झालेली हिरव्या चाऱयाची कमतरता बऱयाच प्रमाणात दूर होऊ शकते असे दूध उत्पादकांचे म्हणणे आहे.
दरम्यान या संदर्भात दूध उत्पादक भोलो डोईफोडे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना हिरव्या चाऱयाची कमतरता असल्याचे स्पष्ट केले. यामुळे याचा मोठय़ा प्रमाणात फटका दुधाच्या उत्पादनावर झालेला आहे. यामुळे सध्यातरी गायीचा धंदा परवडण्यासारखा नाही. कारण हिरवा चारा जोपर्यंत उपलब्ध होत नाही तोपर्यंत समाधानकारक परिस्थितीत दुधाचे उत्पादन होत नाही. यामुळे आर्थिक व्यवस्थापन बिघडते.
यामुळे अनेकांनी आतापर्यंत गाई विकून आपला धंदा बंद केल्याचे भोलो डोईफोडे यांनी स्पष्ट केले.
महादेव उसपकर या दूध उत्पादकांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सरकारने हिरवा चारा निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून असलेली योजना अधिक सुटसुटीत करण्याची गरज व्यक्त केली. दूध उत्पादकांना चांगल्या प्रकारची योजना निर्माण करून दिल्यास गोव्यामध्ये मोठय़ा प्रमाणात हिरव्या चाऱयाची निर्मिती होऊ शकते. मात्र त्यासाठी पशू वैद्यकीय खात्याच्या अधिकाऱयांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली आहे.
रामू खरवत यांनी यावेळी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सध्यातरी हिरव्या चाऱयाची कमतरता यामुळे दुधाचे व्यवसाय परवडणारा नाही. यामुळे अनेकांनी या संदर्भातून धंदा बंद केल्याचे त्यांनी सांगितले. बँकेमधून कर्ज घेऊन गायी विकत घेतल्या जातात. मात्र समाधानकारक दुधाचे उत्पादन होत नसल्यामुळे बँकांचे कर्ज फेडणे जमत नाही. यामुळे आतापर्यंत अनेक दूध उत्पादक खर्चात बुडाल्यामुळे हा धंदा बंद केल्याचे त्यांनी सांगितले.