वार्ताहर /नंदगड
गेले दहा-बारा दिवस सतत पडणाऱया पावसामुळे नंदगड भागातील अनेक तलाव तुडूंब भरले आहेत. यामुळे शेतकरीवर्गाला व पशुपालकांना दिलासा मिळाला आहे.
गावच्या पश्चिमेला तीन किलोमीटर अंतरावर तट्टेश्वर किल्ल्याजवळील मोठे जलाशय शेतकऱयांना वरदान ठरले आहे. गेल्या आठवडय़ाभरात मोठा पाऊस झाल्याने हा जलाशय भरला आहे. शनिवारी व रविवारी जलाशयातून ओव्हर-फ्लो होणारे पाणी पाहण्यासाठी जनतेने गर्दी केली होती.
कसबा नंदगड येथील व्हन्नव्वा देवीचा तलाव तुडुंब
खानापूर-यल्लापूर राज्य मार्गालगत कसबा नंदगड गावाजवळ असलेल्या तलावाच्या बांधावर श्री व्हन्नव्वा देवीचे जागृत मंदिर आहे. त्यामुळे या तलावाला श्री व्हन्नव्वा देवीचा तलाव असे संबोधण्यात येते. खैरवाड, गर्बेनहट्टीr या गावांच्या शेतवडीसह डोंगर परिसरातील पाणी मोठय़ा प्रमाणात या तलावात येऊन साठते.
हा तलाव यावषीही पूर्ण क्षमतेने भरला आहे. त्याचबरोबर झुंजवाड, भुत्तेवाडी, चन्नेवाडी, माचीगड, बेकवाड आदी गावांतील तलावही पूर्ण क्षमतेने भरले आहेत.
पंधरा दिवसांनंतर पावसाची खानापुरात उघडीप
पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने रविवारी विश्रांती घेतली. त्यामुळे अधूनमधून सूर्यदर्शन होत होते. रविवारी बाजारात गर्दीही मोठय़ा प्रमाणात दिसून आली. काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने नदी-नाले भरून वाहत होते. मात्र, पाऊस थांबल्याने पाणी पातळी झपाटय़ाने ओसरली. त्यामुळे हलात्री पुलासह अनेक पुलांवरील पाणी कमी झाल्याने वाहतूक सुरू होती. पावसामुळे शेतजमीन पूर्णपणे उंबळली असून भात व इतर पिकांना पोषक वातावरण आहे.
तालुक्यातील बऱयाच भागात भात रोपणीचेही काम अंतिम टप्प्यात आले आहे. पश्चिम भागातील बटाटा व रताळी लागवडीचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे. आतापर्यंत झालेल्या पावसाने शेतकऱयांना बऱयापैकी हंगाम मिळाला आहे.