वार्ताहर /माशेल
तिवरे येथील श्री शांतादुर्गा मंदिर समोरील पाण्याच्या टाकीतून दिवसाकाठी लाखो लिटर पाणी वाया जात असून पाणी विभागाच्या अधिकाऱयांना त्याची कल्पना देऊनही गळती लागलेली जलवाहिनी दुरुस्त केली जात नाही. संजीव कुंडईकर यांनी यासंबंधी माहिती देताना सांगितले की, दुपारी 1 वाजल्यापासून टाकीतून मोठय़ा प्रमाणात पाणी वाहू लागते व सायं. 6 वा. पर्यंत मोठय़ा प्रमाणात पाणी वाया जाते. पाणी विभागाच्या बाणस्तारी येथील कार्यालयात सांगितल्यानंतर काही वेळा पाणी बंद केले जाते.
गेल्या काही वर्षांपासून टाकीतून पाणी वाया जाण्याचा हा प्रकार सुरु आहे. बाणस्तारी येथे पाणी विभागाचे कार्यालय आहे. मात्र त्यांना याची कल्पना असूनही लाखो लिटरची ही गळती थांबविण्याची तसदी घेतली जात नाही. माशेल भागातील महालक्ष्मी मंदिर परिसर व अन्य काही भागातील नागरिकांना वेळेवर पाणी मिळत नाही. त्यासंबंधी नागरिकांच्या अनेक तक्रारी आहेत. एका बाजूने लोकांना पाण्याची समस्या भेडसावते तर दुसरीकडे दिवसाकाठी लाखो लिटर पाणी वाया जाते. सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन पाण्याची नासाडी थांबवावी अशी मागणी संजीव कुंडईकर यांनी केली आहे.