प्रतिनिधी / खानापूर : लालवाडी चापगाव रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे. या रस्त्यावर पडलेल्या लहान-मोठ्या खड्ड्यामुळे रस्त्याचे अस्तित्वच नाहीसे झाले असून रस्त्यावर डबकी तयार झाली आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून चापगाव, कारवाया, लालवाडी, कारलगाहट्टी या गावातील रहिवाशांना रस्त्यावरून वाहतूक करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर अनेकवेळा अपघातही घडले आहेत.
मागील वर्षभरापासून या रस्त्याची अशी अवस्था झालेली आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचे साफ दुर्लक्ष झाले आहे. गेल्या आठ दिवसापासून या रस्त्यावरून बिडी पारिश्वाड रस्त्यावरील पुलावर भगदाड पडल्याने सार्वजनिक बांधकाम खात्याने हा रस्ता वाहतुकीस बंद केलेला आहे. त्यामुळे चापगाव लालवाडी या रस्त्यावर वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. होणाऱ्या वाहतुकीमुळे लालवाडी चावगाव ही रस्ता रस्त्यावरील छोटे पूल खचण्याची संभवना असल्याने रस्ता बंद होणार होण्याची भीती व्यक्त होत आहे.
लालवाडी जवळील छोटा पुल या होणाऱ्या वाहतुकीमुळे खचण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे हाही रस्ता वाहतुकीस बंद होण्याचा धोका निर्माण झाला आहे. कारलगा पंचायतीच्या वैष्णवी काद्रोळकर, रवी सुतार, परसराम घाडी, संजय पाटील, अंकित सुतार, ग्रामपंचायत सदस्यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याने रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करावा अशी मागणी केली आहे.