कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 24 तासापासून पावसाने उसंत घेतली असली तरी धरण क्षेत्रात आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम आहे. प्रचंड प्रमाणात पाऊस झाल्याने शाहूवाडी तालुक्यातील करंजफेणजवळील धावडा खिंड येथे भूस्खलन झाले आहे. मध्यरात्री हा प्रकार घडला असून, पहाटे हा प्रकार उघडकीस आला.
दरम्यान, प्रशासनाकडून तात्काळ माती बाजूला हटवण्याचे काम हाती घेण्यात आले. त्यानंतर आता या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.