बालासोर / वृत्तसंस्था
भारताने सोमवारी अग्नी-4 या मध्यम पल्ल्याच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण केले. ओडिशा येथील एपीजे अब्दुल कलाम तळावरून संध्याकाळी 7.30 वाजता क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण करण्यात आले. प्रक्षेपणाने सर्व बाबींची पूर्तता केली असून देशाच्या लष्करी क्षमतेत लक्षणीय वाढ झाल्याचे संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आले. ही एक नियमित प्रक्षेपण चाचणी होती. या चाचणीमुळे भारताच्या ‘विश्वसनीय किमान प्रतिबंध’ क्षमतेच्या धोरणाला बळकटी मिळाल्याचे सांगण्यात आले. हे क्षेपणास्त्र 4000 किमी अंतरावरील लक्ष्य देखील नष्ट करू शकते.