नवी दिल्ली
भारतीय जीवन विमा निगम अर्थात एलआयसीने ‘धनसंचय’ ही नवी योजना 14 जूनपासून अंमलात आणली आहे. या योजनेचे अनेक लाभ ग्राहकांना घेता येणार आहेत. सुरक्षिततेबरोबरच बचतीसाठीही ही पॉलिसी मोलाची ठरणार आहे.
नियमित उत्पन्नाचा लाभ देण्याबरोबरच मुदतीनंतर योग्य तो परतावाही ग्राहकांना मिळू शकणार आहे. 5 ते 15 वर्षांचा कालावधी प्रिमियमसाठी या योजनेत असणार आहे. लेव्हल इन्कम बेनिफिट्स, इन्क्रिझिंग इन्कम बेनिफिट आणि सिंगल प्रिमियम लेव्हल इन्कम बेनिफिट अशा स्तरावरती ही पॉलिसी घेता येणार आहे. योजना घेतल्यानंतर संबंधित ग्राहकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना आवश्यक ती रक्कम मिळू शकणार आहे. या योजनेंतर्गत 3 लाख 30 हजार रुपये, 2 लाख 50 हजार रुपये इतका कमीत कमी निश्चित परतावा योजना घेतलेल्या ग्राहकांना मिळू शकणार आहे. योजनेत सहभाग घेण्यासाठी कमीत कमी तीन वर्षे ही वयोमर्यादा असणार आहे. यासंबंधीची सविस्तर माहिती आपल्याला त्यांच्या संकेतस्थळावरून, एजंटकरवी अथवा प्रत्यक्ष कार्यालयात भेटून घेता येणार आहे.