पुणे / प्रतिनिधी :
राज्यातील थंडीचा कडाका मोठय़ा प्रमाणात कमी झाला असून, काही भागांत उकाडाही जाणवत आहे. दरम्यान, राज्यात गोंदिया येथे सर्वात कमी 9.5 अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदविण्यात आले.
राज्यात विदर्भ वगळता इतरत्र किमान तापमान 4 ते 5 अंश सेल्सिअसने, तर कमाल तापमान 2 अंश सेल्सिअसने वाढले आहे. थंडीचा कडाका कमी झाल्याने तसेच कमाल व किमान तापमानातील फरकामुळे राज्याच्या बऱयाचशा भागात उकाडा जाणवत आहे. बोचऱ्या थंडीची जागा आता घामांच्या धारांनी घेतली आहे. दरम्यान, ही स्थिती पुढील दोन ते तीन दिवस कायम राहणार आहे. उत्तरेकडे मोठय़ा प्रमाणात बर्फवृष्टी होत असून, या भागातील किमान तापमान घटले आहे. यामुळे राज्यात पुन्हा किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. राज्यातील कोरडे हवामानही थंडीसाठी पोषक ठरणार असून, यामुळे थंडी वाढेल.
राज्यातील प्रमुख शहरांत नोंदविण्यात आलेले किमान तापमान पुढीलप्रमाणे अंश सेल्सिअसमध्ये :
कुलाबा 23, सांताक्रूझ 20, रत्नागिरी 23.5, डहाणू 18. पुणे 17.1, लोहगाव 18.7, जळगाव 12.7, महाबळेश्वर 16.7, मालेगाव 15.8, नाशिक 13.3, सांगली 21.3, सातारा 21.3, सोलापूर 20, औरंगाबाद 12.2, परभणी 14.5, नांदेड 15.4, अकोला 14, अमरावती 12.4, बुलढाणा 14.5, ब्रह्मपुरी 13, चंद्रपूर 13.4, नागपूर 11.3, वर्धा 12, पणजी 24.8.