मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आवाहन : 13 पासून 16 ऑगस्टपर्यंत महोत्सव
प्रतिनिधी /पणजी
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दि. 13 ते 16 ऑगस्ट रोजी राज्यातील सर्वांनी आपापल्या घरावर आपला राष्ट्रीय ध्वज तिरंगा फडकवावा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे. तिरंगा झेंडय़ाच्या कायद्यात दुरुस्ती करण्यात आली असल्याने रात्रीच्यावेळी झेंडा उतरविण्याची गरज नाही. विविध दुकानांवर तसेच ग्रामपंचायत, विद्यालये, महाविद्यालयांमध्ये झेंडे उपलब्ध असतील. प्रत्येकाने अभिमानाने झेंडे विकत घेऊन आपल्या घरावर फडकवावे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. काल सोमवारी आल्तिनो येथील शासकीय निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली.
राज्यात साडेचार लाख झेंडे
प्लास्टिकचे झेंडे वापरल्यास कारवाई केली जाईल. कपडय़ाचे झेंडे तयार करण्यात आले असून अजूनही त्याचे काम सुरु आहे. झेंडय़ाचे वेगवेगळे तीन आकार आणि त्यांचे दरही ठरविण्यात आले आहेत. गोव्यात सुमारे साडेचार लाख झेंडे तयार होणार असून हे काम काही सेल्फ हेल्प ग्रूपना देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
कसे असणार झेंडे?
तीन आकारांमध्ये असणार झेंडे
किमंत 30रु., 25रु., 15 रु.
कुठे उपलब्ध होणार झेंडे?
दुकाने, ग्रामपंचायत, विद्यालये, महाविद्यालये
पिंगली व्यंकय्या यांची जन्मशताब्दाr
मंगळवार 2 ऍागस्ट रोजी पिंगली व्यंकय्या यांची जन्मशताब्दी असून त्या दिवसापासून प्रत्येकाने सोशल मीडियावर तिरंगा झेंडा डिपी ठेवावा, असेही आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. तिरंगा झेंडय़ाचे डिझाईन पिंगली व्यंकय्या यांनी केले होते, त्याचे स्मरण ठेवण्यासाठी आजचा दिवस साजरा करण्यात येत आहे.
हुतात्म्यांच्या कुटुंबियांचा सन्मान
गोव्याला स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी ज्या 71 जणांनी आपले बलिदान दिले त्या हुतात्म्यांच्या कुटुंबियांना सन्मान प्रशस्तीपत्र देण्यात येईल. 71 पैकी 41 हुतात्मे हे गोव्यातील असून 30 हुतात्मे हे अन्य राज्यांतील आहेत. या सर्वांच्या कुंटुंबियांना संपर्क करणे सुरु असून त्यांना हे प्रशस्तीपत्र दिले जाईल. काही जणांना राजधानीत होणाऱया स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात प्रशस्तीपत्र दिले जाईल तर काही जणांना तालुका पातळीवर होणाऱया कार्यक्रमात दिले जाईल.
राज्यभरात विविध स्तरांवर कार्यक्रम
राज्यभरात तालुका स्तरावर तसेच जिल्हा स्तरावर स्वातंत्र्यदिनाचे कार्यक्रम आयोजित केले असून राज्य सरकारच्या विविध खात्यांतर्फे अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. भारतीय स्वांतत्र्याचा अमृमहोत्सव सर्वांनी मोठय़ा उत्साहात आणि विविध कार्यक्रमांनी साजरा करावा. सरकातर्फे भगरच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
पंचाहत्तर आठवडे आजादी का महोत्सव
गेले वर्षभर केंद्र सरकारच्या सहकार्याने राज्यात वर्षभर विविध कार्यक्रम साजरे करण्यात आले. राज्यातच नव्हे तर देशभरात हा महोत्सव सुरु आहे. महोत्सवाची सुरुवात 12 मार्च 2021 रोजी साबरमती आश्रमातून झाली होती. त्या कार्यक्रमात गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून आपल्याला सहभागी होण्याची संधी मिळाली होती. 12 मार्च ते 15 ऑगस्ट असे 75 आठवडे आजादी का अमृत महोत्सव साजर केला जात आहे, असे त्यांनी सांगितले.
देशाचा विकास कसा होईल, या संदर्भात चर्चा करण्यासाठी 6 ऑगस्ट रोजी राष्ट्रपती भवनमध्ये सभा बोलाविण्यात आली आहे. त्या सभेतही अपण मुख्यमंत्री या नात्याने सहभागी होणार आहे. देशातील खासदार आणि मुख्यमंत्री या सभेत उपस्थित रहाणार आहेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.