मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आवाहन : पर्वरीत सेवा, सुशासन,गरीब कल्याण उपक्रमांची जागृती
प्रतिनिधी /पर्वरी
केंद व राज्य सरकार योजना तयार करतात पण त्या शेवटच्या घटकापर्यंत पोचत नाहीत तर काही योजना लालफितीत राहतात. त्यामुळे राज्य सरकारने पुढाकार घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्व योजना सामान्य नगरिकापर्यंत नेण्यास प्रारंभ केला आहे. त्यामुळे प्रत्येकजण स्वबळावर उभा राहू शकेल. तसेच पंतप्रधान मोदी यांच्या स्वप्नातील भारत निर्माण करण्यासाठी सर्वांनी पुढे यावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला आठ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे सर्वत्र राबविल्या जात असलेल्या सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण उपक्रमांची जागृती करण्याच्या उद्देशाने आयोजित केलेल्या मेळाव्यात मुख्यमंत्री डॉ. सावंत बोलत होते.
व्यासपीठावर केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, पर्यटन मंत्री रोहन खंवटे, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानवडे, गुरुप्रसाद पावसकर, अशोक शेट्टी, रीना फ्ढर्नांडिस, मंडळ अध्यक्ष किशोर अस्नोडकर, सुकुर सरपंच संदीप मांजरेकर, पेन्ह दी फ्ढ्रांक सरपंच मनीषा नाईक उपस्थित होत्या.
कोविड संक्रमण काळात सर्व लोक भयभीत असताना पंतप्रधान मोदी यांचे कार्य कौतुकस्पद होते. ही महामारी आटोक्मयात आणण्यासाठी अनेक यंत्रणा उभी केली. मोठय़ा धैर्याने ही महामारी आटोक्मयात आणण्यास यश मिळविले. त्यानंतर देशात अनेक कल्याणकारी योजना राबविल्या, असे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले.
पंतप्रधान मोदी यांच्या योजना तळागाळतील लोकपर्यंत पोचविण्यासाठी लोक सहकार्य करतील यात शंका नाही. मतदारसंघाचा कायमस्वरूपी विकास करणे हे आमचे ध्येय आहे. तसेच कोरोना काळात भाजप सरकारने केलेल्या कामाचा आढावा पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी भाषणात घेतला.
केंद्रातील भाजप सरकारला आठ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या काळात गरीबांसाठी सुरू झालेल्या योजना त्यांच्यापर्यंत पोहचल्यात की नाही, जर पोहचल्या नसतील तर त्यांना त्या मिळवून द्याव्यात, असा हा दहा दिवसांचा उपक्रम आहे. असे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानवडे यांनी सांगितले.
यावेळी इब्राहीम आगा, रीना फ्ढर्नांडिस, संदीप मांजरेकर यांची भाषणे झाली. समीर साखळकर यांनी सूत्रसंचालन केले. अनुज हरमलकर यांनी आभार मानले.