21 हजार कोटी रुपयांच्या संकलनाची सरकारला अपेक्षा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतीय आयुर्विमा महामंडळाची (एलआयसी) बहुचर्चित ‘इनिशिअल पब्लिक ऑफर’ (आयपीओ) 4 मे 2022 या दिवशी खुली करण्यात येण्याची दाट शक्यता आहे. या आयपीओची बऱयाच काळापासून प्रतीक्षा होती. याद्वारे केंद्र सरकार एलआयसीतील आपले 3.5 टक्के समभाग विक्रीला काढणार आहे. या आयपीओचे अँकर बुक 2 मेला खुले होणार आहे, असे स्पष्ट करण्यात आले.
हा आयपीओ 9 मे यादिवशी बंद होणार आहे. प्रारंभीची योजना 5 टक्के समभाग विक्रीची होती. मात्र, नंतर हे प्रमाण 3.5 टक्क्यांवर आणण्यात आले आहे. सेबीने या आयपीओला मान्यता दिली आहे. या 3.5 टक्के समभागांपैकी काही समभाग एलआयसीचे पॉलिसीधारक आणि कंपनीचे कर्मचारी यांच्यासाठी आरक्षित असतील. या आरक्षणाचे प्रमाण आणि डिस्काऊंट यासंबंधी आज बुधवारी माहिती दिली जाणार आहे, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.
विविध घटकांसाठी खरेदीत आरक्षण
विक्री करण्यात येणाऱया समभागांपैकी पन्नास टक्के समभाग विषेश संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (क्युआयबी) आरक्षित असतील असे प्रथम स्पष्ट करण्यात ओ होते. यांपैकी 60 टक्के समभाग अँकर इन्व्हेस्टर्ससाठी त्यांचा विषेशाधिकार म्हणून राखून ठेवण्यात आल्याचेही घोषित करण्यात आले होते. तर अँकर इन्व्हेस्टर्ससाठी राखीव समभागांच्या 20 टक्के समभाग देशी म्युच्युअल फंडांसाठी राखीव आहेत. तर 15 टक्के समभाग बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (एनआयआय) आरक्षित आहेत. तर ऊर्वरित 35 टक्के समभाग सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी आरक्षित ठेवण्यात आलेले आहेत. विद्यमान पॉलिसी धारकांसाठीही काही समभाग राखून ठेवण्यात आले आहेत. मात्र, त्यांचे प्रमाण 10 टक्क्यांहून अधिक असणार नाही. एलआयसी कर्मचाऱयांसाठीही 5 टक्के समभाग राखीव आहेत. कर्मचारी आणि पॉलिसी धारक यांना हे समभाग सवलतीच्या दरात मिळणार आहेत.
अँकर इन्व्हेस्टर्स उत्सुक
अँकर इन्व्हेस्टर्सकडून आयपीओ खुला होण्याआधीच 13,000 कोटी रुपयांचे गुंतवणूक प्रस्ताव आले आहेत. ही रक्कम त्यांच्यासाठी आरक्षित असणाऱया समभागांच्या किमतीपेक्षा दुप्पट आहे, अशीही माहिती देण्यात आली आहे.
एलआयसीचा आवाका…
एलआसी कंपनीच्या सर्व समभागांचे एकंदर बाजारमूल्य 6 लाख कोटी इतके आहे. ही कंपनी पूर्णतः केंद्र सरकारच्या स्वामित्वातील आहे. केंद्र सरकार आपले3.5 टक्के समभाग विक्रीला काढत आहे. त्यातून 21 हजार कोटी रुपयांहून अधिकच प्राप्ती अपेक्षित आहे. गेल्या आर्थिक वर्षातच हा आयपीओ येणार होता. तथापि, युक्रेन-रशिया युद्धामुळे ही प्रक्रिया लांबल्याचे स्पष्ट करण्यात आले.
सर्वात मोठा आयपीओ
एलआयसीचा हा आयपीओ आतापर्यंतच्या इतिहासातील भारतातला सर्वात मोठा आहे. यापूर्वी पेटीएमचा 2021 मधील 18,300 कोटीचा आयपीओ आणि कोल इंडियाचा 2010 मधील 15,500 कोटींचा आयपीओ मोठे मानले जात होते. एलआयसी त्यांना मागे टाकण्याची शक्यता आहे. 2008 मध्ये रिलायन्सनेही 11,700 कोटींचा आयपीओ बाजारात आणला होता.
गुंतवणूकदारांना सुवर्णसंधी…
ड सर्वसामान्य गुंतवणूकदारांना लाभदायक गुंतवणुकीची संधी मिळणार
ड युपेनच्या युद्धामुळे गेल्या वर्षी येणार असलेला आयपीओ लांबणीवर
ड भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा आयपीओ म्हणून आहे ख्याती
ड केंद्र सरकार आपले 3.5 टक्के समभाग याद्वारे विकायला काढणार