अध्याय सतरावा
उद्धवाला दहा उत्तम गुणांची माहिती देताना भगवंत म्हणाले, माझ्या पदाची प्राप्ती होईल आणि कोणत्याही वर्णाला उत्तम गती प्राप्त होईल, अशा गुणांचीही लक्षणे तुला मी सांगतो. उद्धवा! सर्व लक्षणांचे केवळ सार, गुह्य गुणांचे केवळ भांडार आणि ज्याच्या योगाने खरोखर संसारातून पार होता येते, ते तू नीट ऐकून घे. साऱयाच वर्णाचा जो सहजधर्म, ज्याच्या योगाने परब्रह्माची प्राप्ती होते, ज्यांच्या योगाने मनातील भ्रम दूर होतो, ते उत्तम गुण ऐक. ज्या उपायाने दुसऱयाला सुख होईल तो उपाय करणे, हे मलाच पोचते. त्याचप्रमाणे कोणाला त्रास न देणे, परपीडा न करणे, दुसऱयाला दुःख न देणे, ह्या योगानेही उद्धवा ! मला सुख होते असे तू निश्चित जाण. दुःख न देता सुख देणे ह्यालाच ‘अहिंसा’ असे म्हणतात. हा पहिला गुण समजावा. आता दुसरा गुण जो ‘सत्य’ त्याची लक्षणे ऐक. ज्याचे मन आणि वाणी जागृतीत, स्वप्नात किंवा सुषुप्तीतही असत्यदोषाला लवमात्र स्पर्श करीत नाही, निंदा व नरस्तुती, तसेच खोटे बोलणे हे ज्याला माहीत नाही, वाणीला जो सोवळी राखतो, त्या साऱयाला ‘सत्य’ म्हणतात. अहिंसा व सत्य या गुणांबद्दल भगवंत बोलत होते. पुढे म्हणाले, आता ‘अचौर्य’ म्हणजे काय ते सांगतो. अधर्माने एका कवडीपासून कोटीचाही लाभ जो दृष्टीपुढे आणीत नाही, दुसऱयाच्या फुटक्मया कवडीलाही जो शिवत नाही. तिकडे चोरी करणे किंवा एखाद्याचा डोळा चकवून वस्तु घेणे, अथवा न विचारता नेणे हे जीव गेला तरी शक्मय नाही. अन्यायाने मिळविलेल्या द्रव्याला त्याचे मन स्वप्नातसुद्धा शिवावयाचे नाही. उद्धवा ! हे अचौर्याचे लक्षण. हाच तिसरा गुण होय. स्वधर्मानेसुद्धा द्रव्य हातात पडावे इतकाही ज्याला धनलोभ नसतो, कामिनी-कामाची वार्तासुद्धा ज्याला माहीत नसते, परस्त्रीला जो निश्चयाने मातेसमान मानतो उद्धवा! याचेच नाव खरोखर ‘अकामता’ म्हणजे निरिच्छपणा असे तू समज. हेच चौथे लक्षण होय. आता ‘अक्रोधाचे’ लक्षण ऐक. कामाचा जेथे पगडा नाही, तेथे क्रोधाचेही काही चालत नाही. आकाशाला ज्याप्रमाणे शस्त्र रुतत नाही किंवा बी जरी कितीही चांगले असले, तरी त्याला जमिनीशिवाय जसा अंकुर फुटावयाचा नाही त्याप्रमाणे कामाशिवाय क्रोध हा कधीच वाढायचा नाही. ज्याप्रमाणे गर्भवती स्त्रीचे मरण गर्भालाही मारून टाकते, तद्वत् इच्छांची बोळवण झाली की, त्याच्या बरोबर क्रोधाचीही बोळवण झालीच म्हणून समजावे. मस्तकच तुटून गेले म्हणजे हातापायांच्या क्रियाही चालत नाहीत, त्याप्रमाणे काम नाहीसा झाला की क्रोधाचीही गोष्ट संपलीच. कामक्रोधच जेथे नाहीत, तेथे लोभ तरी उठणार कसा? बुडाला माती नसेल वृक्ष कधीच वाढायचा नाही. ह्याचेच नांव ‘निर्लोभता’ हे तू सत्य जाण, खरोखर क्रोधाला आणि लोभाला वाढविणारा काय तो एक कामच. जेथे कामाचे कार्य अपुरे राहाते तेथेच क्रोधाचे तेज चढते आणि कामाचे मनोरथ पूर्ण होतात, तेव्हा लोभाचे बंड नाचू लागते. ज्याप्रमाणे दिव्याची ज्योत, तेजाळा व काजळीला बरोबर वागविते, त्याप्रमाणे क्रोधाचा आणि लोभाचा बडेजाव नेहमी कामाजवळच असतो. आता प्राणिमात्रांचे प्रियत्वाने असणारे हित कसे साधता येते तेही सांगतो ऐक. जितके आपल्याला शक्मय असेल, तितके प्राणिमात्राचे हित करीत असावे. त्यांना ज्याची अगत्याने गरज असेल, ते ते त्यांना देत असावे. अंतःकरणाच्या कळवळय़ाने अन्न, वस्त्र, दान, मान वगैरे देऊन प्राणिमात्रांचे प्रिय असे आचरण करीत असावे हा सर्वांचाच स्वधर्म होय हे लक्षात ठेव. प्राणिमात्राचे असे प्रिय करावे की, शेवटी ते त्यांच्या हितालाच कारण होईल. जे प्रिय त्यांच्या हिताला बाधक होईल ते कधीही करू नये. प्राणिमात्रांचे प्रिय व हित करणारा असा जो पुरुष संसारात असेल, त्याच्या घरी मी भगवंत सर्वदा सर्व प्रकारे कल्याणच करीत असतो. प्राणिमात्राचे इष्ट आणि हित तो करतेवेळी त्याच्या संकटाची मी स्वतःच श्रीकृष्ण होळी करून टाकतो
क्रमशः