शेतकऱयाला आर्थिक फटका, पशुपालकांनी खबरदारी घेणे आवश्यक
प्रतिनिधी /बेळगाव
तालुक्मयाच्या पूर्वभागात मर्यादित असलेल्या लम्पिस्कीन संसर्गजन्य आजाराने तालुक्मयात सर्वत्र पाय पसरले आहेत. लम्पिस्कीन रोगाचा प्रादुर्भाव सुरूच असल्याने पशुपालक चिंतेत आहेत. शनिवारी टोपगार गल्ली, नंदिहळ्ळी येथील माणिक भीमाप्पा कुरबर यांचा बैल लम्पीने दगावला आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक फटका बसला आहे. ऐन कामाच्या दिवसातच बैल दगावल्याने कुटुंबीयांसमोर अडचणी वाढल्या आहेत.
लम्पिस्कीन विषाणूजन्य रोगाने तालुक्मयात धुमाकूळ घातला आहे. या आजाराची हजारो जनावरांना लागण झाली आहे. तर शेकडो जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. दरम्यान, शासनाने केवळ तुटपुंजी मदत जाहीर केली आहे. त्यामुळे पशुपालकांतून नाराजी व्यक्त होत आहे. विशेषतः तालुक्मयाच्या पूर्वभागात दगावणाऱया जनावरांची संख्या अधिक आहे. त्यामध्ये शर्यतीच्या बैलांचादेखील समावेश आहे. त्यामुळे मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. साधारण बाजारभावाप्रमाणे शेतात काम करणाऱया बैलजोडीची किंमत 70 ते 80 हजार रुपये आहे. मात्र, शासनाकडून केवळ 20 ते 30 हजार रुपये नुकसानभरपाई जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे केवळ तोंडाला पाने पुसण्यात येत असल्याचा आरोप शेतकऱयांतून होत आहे. तालुक्मयात केवळ पूर्वभागात या रोगाचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात दिसून आला. मात्र, आता सर्वत्र या रोगाची लागण झालेली जनावरे समोर येत आहेत. त्यामुळे पशुपालकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे.