प्रतिनिधी / खानापूर : तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने 21 ऑक्टोंबर पासून काढण्यात येणाऱ्या जागृती दिंडीच्या पत्रकाचे अनावरण आज येथील शिवस्मारकात करण्यात आले. यावेळी 21 ऑक्टोबर पासून तालुक्यात ज्ञानेश्वर व तुकाराम गाथा दिंडी गावोगावी काढून समितीच्या बाबत जागृती करण्यात येणार आहे. या पत्रकाच्या अनावरण प्रसंगी यशवंत बिरजे यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली.
यावेळी माजी आमदार दिगंबर पाटील, मुरलीधर पाटील, प्रकाश चव्हाण, बाळासाहेब शेलार, महादेव घाडी, नारायण कापोलकर, शिवाजी पाटील ,डीएम गुरव, रुक्माणा झुंजवाडकर, यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते. शनिवारी मंतुर्गा व असोगा या ठिकाणी 21 ऑक्टोंबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जागृती दौरा सुरू करण्यात आला.