ऑनलाईन टीम/तरुण भारत
राज ठाकरे (raj thackeray) यांनी मशिदींवरील भोंगे उतरवा नाहीतर दुप्पट पटीने मशिदींसमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा लावू, असा इशारा त्यांनी आपल्या जाहीर सभेतून दिला आहे. मनसेच्या आंदोलनाला ४ मे पासून सुरूवात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु आज रमजान ईद (ramzan eid) असल्यामुळे आणि औरंगाबादच्या सभेत राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, यामुळे राज ठाकरेंच्या घराबाहेरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. तसेच अक्षय्य तृतीयेच्या (akshaya tritiya) पार्श्वभूमीवर मनसेकडून राज्यात ठिकठिकाणी मंदिरांमध्ये महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं. परंतु राज यांनी महाआरती रद्द केली आहे. तसेच मनसे पदाधिकाऱ्यांची आज महत्वाची बैठं देखील होणार आहे. निवडक पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर राज ठाकरे लाऊडस्पीकरवर पक्षाची भूमिका जाहीर करतील.
दरम्यान, अक्षय्य तृतीयेच्या पार्श्वभूमीवर आज मनसेकडून राज्यात ठिकठिकाणी मंदिरांमध्ये महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं. परंतु राज ठाकरेंनी अचानक माघार घेत महाआरती रद्द केली आहे. ईद असल्यामुळे राज ठाकरेंनी असा निर्णय घेतला असल्याचे समजते आहे. दरम्यान भोंग्याबाबतच्या निर्णयावर राज ठाकरे आपली भूमिका आज जाहीर करणार असल्याचही नमूद केलं आहे. राज यांनी सोशल मीडियावर पत्र पोस्ट करत आरती न करण्याचं आवाहन केलं आहे. तसेच सकाळी दहा वाजता मनसेच्या महत्त्वाच्या नेत्यांच्यासोबत राज ठाकरेंची शिवतीर्थवर बैठक आहे. त्यानंतर ते आपली भूमिका जाहीर करणार आहे. परंतु ते कोणती घोषणा करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.