मुंबई / प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांनी मशिदींवरील लाऊडस्पीकर हटवण्यासाठी औरंगाबाद येथे झालेल्या सभेत राज्य सरकारला मुदत दिली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यासोबत कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीवर बैठक घेत आहेत, असे एएनआय वृत्तसंस्थेने सांगितले आहे. सोमवारी गृहमंत्री वळसे-पाटील, महाराष्ट्राचे पोलिस प्रमुख रजनीश सेठ आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनीही यावर आढावा बैठक घेतली होती.
औरंगाबादच्या सभेत राज ठाकरे यांनी ४ मे पासून मशिदींवरील लाऊडस्पीकर न काढल्यास हनुमान चालीसा दुप्पट आवाजात वाजवा, असे आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे.
राज ठाकरे यांनी नुकत्याच केलेल्या मशिदींवरील लाऊडस्पीकरच्या विरोधातील भाषणाबद्दल औरंगाबाद पोलिस यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करतील, असे पोलिस प्रमुख रजनीश सेठ यांनी सांगितले असून तरीही मुख्यमंत्र्यांची बैठक होत आहे.
पोलीसप्रमुख सेठ म्हणाले की, 13,000 हून अधिक लोकांना सीआरपीसीच्या कलम-149 अंतर्गत नोटिसा जारी करण्यात आल्या आहेत. “औरंगाबादचे पोलीस अधीक्षक भाषण पाहत असून ते आवश्यक ती कायदेशीर कारवाई करतील,” असे सेठ यांनी पत्रकारांना सांगितले. तसेच “महाराष्ट्र पोलीस कोणत्याही प्रकारची कायदा व सुव्यवस्था हाताळण्यास सक्षम आहेत. तसेच राज्यात एसआरपीएफ आणि होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत,” पोलीसप्रमुख सेठ यांनी म्हटले आहे.