पाच मुली आणि एका मुलाचा मृत्यू, महाड तालुक्यातील बोरवडी गावातील घटना
ऑनलाईन टीम/तरुण भारत
महाराष्ट्राला (maharashtra) काळिमा फासणारी घटना रायगड (Raigad) जिल्ह्यात घडली आहे. आईने पोटच्या लेकरांना विहिरीत ढकलून देत मारून टाकलं. घटनेतील मृतांमध्ये पाच मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. प्राथमिक माहितीनुसार महिलेनं कौटुंबिक वादातून महिलेनं टोकाचं पाऊल उचललं. तर मुलांना विहिरीत ढकलून दिल्यानंतर महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिला वाचवण्यात यश आलं आहे.
महिलेने विहिरीत ढकलेली मुली आणि मुलगा अल्पवयीन आहेत. मृत बालकं १० ते एक वर्ष वयोगटातील आहेत. रुना चिखुरी सहानी (वय ३० ) असं या महिलेचं नाव आहे. रोशनी चिखुरी सहानी (वय १०), करिष्मा चिखुरी सहानी (वय ८), रेश्मा चिखुरी सहानी (वय ६), विद्या चिखुरी सहानी (वय ५ ), शिवराज चिखुरी सहानी (वय ३) आणि राधा चिखुरी सहानी (वय दीड वर्ष) अशी मृत मुलांची नावं आहेत.
रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात ही भयंकर घटना घडली आहे. महाड (mahad) तालुक्यातील बोरवाडी गावात सोमवारी सायंकाळी हा प्रकार घडला. आईने आपल्या पोटच्या मुलांना विहिरीत ढकलून दिल. यामध्ये पाच मुली आणि एका मुलाचा मृत्यू झाला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती आहि की, घटनेतील मृतांमध्ये पाच मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. महिलेला सासरच्या मंडळीकडून मारहाण करण्यात आली. त्यामुळे राग अनावर झालेल्या महिलेनं टोकाचं पाऊल उचलंत पोटच्या सहा मुलांना विहिरीत ढकलून दिलं.